शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'हर घर नल से जल'मध्ये वर्धा जिल्हा ठरला नागपूर विभागातून अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:59 IST

९८.२५ टक्के जोडणी झाली पूर्ण : जिल्ह्याची कामगिरी ठरली सरस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठरविण्यात आलेल्या 'हर घर नल से जल' उद्दिष्टानुसार वर्ष २०२४-२५ अंतर्गत वर्धा जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ९४२ कुटुंबांपैकी २ लाख ३४ हजार ७५४ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे काम ९८.२५ टक्के पूर्ण झाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. वर्धा विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेत माहिती घेतात व सूचना करतात. 

१,९८९ नळ जोडणी प्रगतीपथावरजलजीवन मिशनअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी दिली जाते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल से जल' लक्षाप्रमाणे वर्धा विभागाने उत्तम कामगिरी करत ९८.२५ टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १ हजार ९८९ नळ जोडणी प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना