शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

'हर घर नल से जल'मध्ये वर्धा जिल्हा ठरला नागपूर विभागातून अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:59 IST

९८.२५ टक्के जोडणी झाली पूर्ण : जिल्ह्याची कामगिरी ठरली सरस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठरविण्यात आलेल्या 'हर घर नल से जल' उद्दिष्टानुसार वर्ष २०२४-२५ अंतर्गत वर्धा जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ९४२ कुटुंबांपैकी २ लाख ३४ हजार ७५४ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे काम ९८.२५ टक्के पूर्ण झाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. वर्धा विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेत माहिती घेतात व सूचना करतात. 

१,९८९ नळ जोडणी प्रगतीपथावरजलजीवन मिशनअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी दिली जाते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल से जल' लक्षाप्रमाणे वर्धा विभागाने उत्तम कामगिरी करत ९८.२५ टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १ हजार ९८९ नळ जोडणी प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना