शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

वर्धा जिल्ह्यात सूर्य कोपला; साडेतीन हजार हेक्टरवरील संत्राबागांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 09:48 IST

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना झळा

ठळक मुद्देपाणी टंचाईचा फटकाशेतकऱ्यांची बागा वाचविण्याकरिता धडपड सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घाडगे) तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात तीव्रता चांगलीच वाढली आहे. परिणामी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरवरील सत्रा बागा धोक्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी या बागांना वाचविण्याकरिता धडपड सुरु केली आहे.कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक असून या पिकांवरच शेतकऱ्यांचे आथिक बजेट अवलंबून आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना संपन्नता मिळाली तर परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरीसह कुपनलिकाही कोरड्या झाल्याने संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना जास्त पाणी लागत असल्याने बागायतदारांनी कुपनलिका केल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बागायतदारांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु आता जलपातळी खालावल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानाने निर्माण झालेली ही दुष्काळी परिस्थिती बागायतदारांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने विहीरी, कुपनलिका कोरड्या पडत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे संत्राबागा वाळालयला लागल्या आहे.या लाखमोलाच्या बागा वाचविण्याकरिता बागायतदारांनी टँकरव्दारे पाणी विकत घेऊन झाडांना देण्याचा खटाटोप चालविला आहे. पण, या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे दरही १ हजार रुपयाच्या वर गेल्याने विकतचे पाणी देणे बागायतदारांना न परवडणारे आहे. विकतचे पाणी किती दिवस देणार हा प्रश्न पडल्याने संत्रा बागायतदारांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत लाख रुपयाचे उत्पन्न देणारे झाडं डोळ्या देखत वाढत असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अद्यापही उपाययोजना न झाल्याने तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे.माझ्याकडे सात वर्षाची संत्रा बाग आहे. यावर्षी फळे येतील व केलेला खर्च निघून संसाराला आधार होईल, अशी आशा होती. परंतु दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण बागच पाण्याअभावी वाळून गेली.-पंकज मानकर, चंदेवाणीमाझ्या शेतावर २०० झाडांची फळबाग आहे. यावर्षी विहीर कोरडी झाल्याने संत्रा बाग वाळत आहे. संत्रा बाग वाचविण्यासाठी लागणारा खर्च कोठून करायचा हा प्रश्नच आहे.-पंजाबराव इंगळे, बागायदार, चंदेवाणीसंत्रा पिकांवर गेल्या दहावर्षापासून किडीच्या प्रमाणात वाढ होवूनही मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा वाचविल्या. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने बागा डोळयादेखत वाळत आहे. त्यामुळे शासनाने बागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.-रवी पठाडे, बागायतदार, सेलगाव (लवणे)

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळ