शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात सूर्य कोपला; साडेतीन हजार हेक्टरवरील संत्राबागांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 09:48 IST

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना झळा

ठळक मुद्देपाणी टंचाईचा फटकाशेतकऱ्यांची बागा वाचविण्याकरिता धडपड सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घाडगे) तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात तीव्रता चांगलीच वाढली आहे. परिणामी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरवरील सत्रा बागा धोक्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी या बागांना वाचविण्याकरिता धडपड सुरु केली आहे.कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक असून या पिकांवरच शेतकऱ्यांचे आथिक बजेट अवलंबून आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना संपन्नता मिळाली तर परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरीसह कुपनलिकाही कोरड्या झाल्याने संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना जास्त पाणी लागत असल्याने बागायतदारांनी कुपनलिका केल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बागायतदारांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु आता जलपातळी खालावल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानाने निर्माण झालेली ही दुष्काळी परिस्थिती बागायतदारांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने विहीरी, कुपनलिका कोरड्या पडत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे संत्राबागा वाळालयला लागल्या आहे.या लाखमोलाच्या बागा वाचविण्याकरिता बागायतदारांनी टँकरव्दारे पाणी विकत घेऊन झाडांना देण्याचा खटाटोप चालविला आहे. पण, या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे दरही १ हजार रुपयाच्या वर गेल्याने विकतचे पाणी देणे बागायतदारांना न परवडणारे आहे. विकतचे पाणी किती दिवस देणार हा प्रश्न पडल्याने संत्रा बागायतदारांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत लाख रुपयाचे उत्पन्न देणारे झाडं डोळ्या देखत वाढत असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अद्यापही उपाययोजना न झाल्याने तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे.माझ्याकडे सात वर्षाची संत्रा बाग आहे. यावर्षी फळे येतील व केलेला खर्च निघून संसाराला आधार होईल, अशी आशा होती. परंतु दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण बागच पाण्याअभावी वाळून गेली.-पंकज मानकर, चंदेवाणीमाझ्या शेतावर २०० झाडांची फळबाग आहे. यावर्षी विहीर कोरडी झाल्याने संत्रा बाग वाळत आहे. संत्रा बाग वाचविण्यासाठी लागणारा खर्च कोठून करायचा हा प्रश्नच आहे.-पंजाबराव इंगळे, बागायदार, चंदेवाणीसंत्रा पिकांवर गेल्या दहावर्षापासून किडीच्या प्रमाणात वाढ होवूनही मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा वाचविल्या. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने बागा डोळयादेखत वाळत आहे. त्यामुळे शासनाने बागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.-रवी पठाडे, बागायतदार, सेलगाव (लवणे)

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळ