शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

Wardha Blast; सीमावर्ती गावांच्या पुनर्वसनाचा विषय थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:55 IST

मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.

ठळक मुद्दे३१ मे २०१६ च्या दुर्दैवी घटनेनंतर झाली होती मागणी

महेश सायखेडेवर्धा: पुलगाव येथील दारूगोळा भंडाराच्या कार्यक्षेत्रात डेल्टा सब डेपो मध्ये ३० मे २०१६ च्या मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर सीएडी कॅम्प परिसराला लागून असलेल्या काही गावांच्या पुनर्वसनाची मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून रेटण्यात आली होती. परंतु, अद्यापही हा विषय मार्गी लागलेला नाही. सन २०१६ च्या त्या घटनेच्या दोन वर्ष लोटूनही जखमा ताज्या असताना मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख.), येसगाव, मुरदगाव व नागझरी या गावातील नागरिकांनी सुरक्षेच्या दुष्टीने आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे रेटली होती. पुलगावयेथील दारूगोळा भंडार प्रशासन त्यांच्या हद्दीत याच गावांच्या शेजारी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करीत असल्याने ही मागणी मे २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत या मागणीवर पाहिजे तसा विचार होऊन कुठलीही प्रक्रिया न झाल्याने ही मागणी थंडबस्त्यात पडली आहे. विशेष म्हणजे त्या वेळी झालेल्या भीषण स्फोटात याच गावांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.१९ जणांचे बलिदानसन २०१६ मध्ये झालेल्या स्फोटात आगीवर नियंत्रण मिळविताना कर्नल आर. एस. पवार, सुरक्षा अधिकारी मेजर मनोज कुमार, नायक रणसिंग, शिपाई रामचंदर, सतीश सत्यप्रकाश या सैनिकांसह अग्निशमन दलाचे बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, अमोल एसनकर, अमित पुनिया, अरर्विंदसिंग, डी. के. यादव. डी. पी. मेश्राम, कृष्णकुमार, कुलदीपसिंग, नवज्योतसिंग, प्रमोद मेश्राम, एस. जी. बाळस्कर यांनी वीर मरण आले. शिवाय १९ जण या घटनेत गंभीर जखमी झाले होते. उल्लेखनीय म्हणजे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात काय पुढे आले या बाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.स्फोटक विनाशक स्थळ बदललेपूर्वी ज्या ठिकाणी स्फोटके निकामी केली जात ते ठिकाण आता पुलगावच्या दारूगोळा भंडाराने बदलविल्याची चर्चा आहे. सदर स्थळ पुनर्वसनाच्या मागणीनंतर बदलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगली जाते. सध्या केळापूर ते सोनेगाव शिवाराच्या दरम्यान सीएडी कॅम्पच्या कार्यक्षेत्रात स्फोटक विनाशक स्थळ तयार केले आहे.पुलगावच्या दारूगोळा भंडाराच्या सीमावर्ती परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट