शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा

By admin | Updated: December 9, 2014 22:55 IST

शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़

सेवाग्राम : शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़ सध्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षाच लागल्याचे दिसते़सोयाबीन देशातील पीक नसताना शेतकरी याकडे वळले़ चांगले उत्पन्न मिळू लागल्याने कापसाच्या खालोखाल सोयाबीनचा क्रमांक लागला़ हळूहळू ज्वारीची पेरणी संपली आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला़ सोयाबीन कमी खर्चाचे व तीन महिन्यांच्या कालावधीचे पीक असून भावही चांगले होते़ यामुळे पेरणी क्षेत्र वाढले़ बियाण्यांचा खर्च वाढला़ दुसरीकडे निसर्गाने असहकार पुकारला आणि सोयाबीनमुळे शेतकरी संपुष्टात येणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ असाच काहीसा प्रकार विदर्भाचे पांढरे सोने असलेल्या कापसाबाबत घडत आहे़ कापसाच्या भरवशावर शेतकरी जगला़ नवीन बियाणे आणि पद्धती यासाठी तो वारेमाप खर्च करू लागला; पण पदरात काहीच पडत नसल्याने हतबल झाला आहे़ कधी अति पाऊस तर कधी दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला़ यंदा रोग, पाणी व लाल्या यामुळे पांढरे सोने एक-दोन वेच्यातच संपुष्टात आले़ ही स्थिती सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे़ शेतीसाठी काढलेले कर्ज फेडणे तर दूरच; पण आता जगायचे कसे, हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ मजुरीचाही प्रश्न गंभीर होणार आहे़ ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार देणारा कापूस होता़ सामान्यपणे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी चालत होती; पण यंदा वेचणी डिसेंबर अखेरपर्यंत चालणार, असे दिसते़ धरण आहे, कालवे, वितरिका, पानसऱ्या आहे; पण अद्याप हमदापूर, आलगाव, भोसा येथे पाणीच पोहोचत नाही़ गहू, चन्याचे कठाण तयार आहे; पण पाणीच नसल्याने शेतकरी रबीच्या पिकाला मुकणार आहे़ खरीब गेले व रबी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्या होत आहे़ शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)