शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा

By admin | Updated: December 9, 2014 22:55 IST

शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़

सेवाग्राम : शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़ सध्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षाच लागल्याचे दिसते़सोयाबीन देशातील पीक नसताना शेतकरी याकडे वळले़ चांगले उत्पन्न मिळू लागल्याने कापसाच्या खालोखाल सोयाबीनचा क्रमांक लागला़ हळूहळू ज्वारीची पेरणी संपली आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला़ सोयाबीन कमी खर्चाचे व तीन महिन्यांच्या कालावधीचे पीक असून भावही चांगले होते़ यामुळे पेरणी क्षेत्र वाढले़ बियाण्यांचा खर्च वाढला़ दुसरीकडे निसर्गाने असहकार पुकारला आणि सोयाबीनमुळे शेतकरी संपुष्टात येणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ असाच काहीसा प्रकार विदर्भाचे पांढरे सोने असलेल्या कापसाबाबत घडत आहे़ कापसाच्या भरवशावर शेतकरी जगला़ नवीन बियाणे आणि पद्धती यासाठी तो वारेमाप खर्च करू लागला; पण पदरात काहीच पडत नसल्याने हतबल झाला आहे़ कधी अति पाऊस तर कधी दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला़ यंदा रोग, पाणी व लाल्या यामुळे पांढरे सोने एक-दोन वेच्यातच संपुष्टात आले़ ही स्थिती सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे़ शेतीसाठी काढलेले कर्ज फेडणे तर दूरच; पण आता जगायचे कसे, हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ मजुरीचाही प्रश्न गंभीर होणार आहे़ ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार देणारा कापूस होता़ सामान्यपणे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी चालत होती; पण यंदा वेचणी डिसेंबर अखेरपर्यंत चालणार, असे दिसते़ धरण आहे, कालवे, वितरिका, पानसऱ्या आहे; पण अद्याप हमदापूर, आलगाव, भोसा येथे पाणीच पोहोचत नाही़ गहू, चन्याचे कठाण तयार आहे; पण पाणीच नसल्याने शेतकरी रबीच्या पिकाला मुकणार आहे़ खरीब गेले व रबी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्या होत आहे़ शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)