२७ हजार लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 25, 2014 23:45 IST2014-05-25T23:45:19+5:302014-05-25T23:45:19+5:30
गावातील साथीचे आजार संपुष्टात आणून गावे स्वच्छ करण्यासाठी शासनाने निर्मल भारत अभियानाची संकल्पना अंमलात आणली. या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी १0 हजार रुपये मिळतात. जिल्ह्यातील

२७ हजार लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
निर्मल भारत अभियान : शौचालय बांधकामाच्या अनुदान वाटपात दिरंगाई अमोल सोटे - आष्टी (श.)(वर्धा) गावातील साथीचे आजार संपुष्टात आणून गावे स्वच्छ करण्यासाठी शासनाने निर्मल भारत अभियानाची संकल्पना अंमलात आणली. या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी १0 हजार रुपये मिळतात. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी अनुदान मिळेल म्हणून कर्जबाजारी होऊन बांधकाम केले; पण मार्च २0१४ नंतर आजपर्यंत केवळ मोजक्याच लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील २७ हजार लाभार्थी अद्याप वंचित आहेत. जि.प. पाणीपुरवठा व स्वच्छता समिती प्रत्येक तालुक्यातील गावोगावी पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यास सांगत आहे. सोबतच पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे. लाभार्थ्यांना शौचालयाचे महत्त्व समजावून सांगितल्यावर लाभार्थी होकार देतात. गरीब कुटुंबाना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असल्याने शौचालय बांधकामास पैसा कसा उभा करावा, याची काळजी असते. अनेक कुटुंबप्रमुखांनी पत्नीचे सोने तारण ठेवून शौचालय बांधकाम केले; पण त्वरित अनुदान वाटप होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात २0१३-१४ मध्ये निर्मल ग्राम अभियानांतर्गत २७ हजार २६१ वैयक्तिक शौचालय बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. पंचायत स्तरावर शौचालय बांधकाम अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करताना आवश्यक अनुसूचित जाती, जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर, अपंग, कुटुंबप्रमुख, विधवा, परित्यक्त्या व महिला कुटुंबप्रमुख असल्याबाबतच्या कागदपत्रांऐवजी अन्य कागदपत्र, शपथपत्र आदी जाचक अटींमुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शासन जनहितार्थ योजना राबविते; त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी चांगल्या योजना ‘फेल’ होतात. याचाच प्रत्यय शौचालय बांधकामात येत आहे. शौचालय बांधकामाचे अनुदान अद्याप न मिळाल्याने लाभार्थी मात्र अडचणीत आलेत.