शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गोवर अन् रुबेला निर्मूलनासाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 23:42 IST

गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आहे. तर रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते.

ठळक मुद्देमंगळवारपासून विशेष मोहीम : ९ ते १५ वयोगटातील बालकांना देणार लस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आहे. तर रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९० टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसगार्तून होत असून या दोन्ही आजारांना हद्दपार करण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेणे कंबर कसली आहे. मंगळवार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ९ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना प्रतिबंधात्मक लस देऊन ‘गोरव’ निर्मुलन आणि ‘रुबेला’वर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करणार आहे.‘जर्मन मिझल’ म्हणजे रुबेलारुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते. हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. गर्भवती मातेस पहिल्या तिमाहित हा आजार झाल्यास बालकामध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकामध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने हृदयाचे आजार तसेच बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो.ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. ही मोहीम पाच आठवडे चालणार असून सुरुवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना लस देण्यात येईल. तर त्यानंतर दोन आठवडे अंगणवाडी केंद्रातील मुला-मुलींना लस देण्यात येईल. तर पाचव्या आठवड्यात ज्यांना लस देण्यात आली नाही अशांचा शोध घेवून त्यांना लस देण्यात येणार आहे.- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा.आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या विशेष लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाºयांनी सहकार्य करावे.- दिलीप उटाणे, राज्य कार्याध्यक्ष, म.रा.जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना.बदलती जीवनशैली ठरतेय धोक्याचीमनुष्य प्राचिन काळापासून निरोगी राहण्यासाठी प्रयत्नरत आहे. अगदी सुरुवातीला ऋषीमुनी आयुर्वेदाचे मदतीने मनुष्याचे जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन करीत असत. आजच्या युगात वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्या माध्यमातून मनुष्याचे जीवन निरोगी ठेवण्याचे आव्हान स्विकारत आहे. तरीही वातावरणातील सुक्ष्मजीव, वातावरणातील बदल, मनुष्याची बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे मनुष्य आजारपणातून मुक्त होऊ शकला नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.गोवर आणि रेबेला आजाराविषयी थोडक्यातगोवर हा माहीत असलेल्या आजारापैकी सर्वात जास्त संसर्गजन्य आजार आहे.मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे.रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात.गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होतो.ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९० टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो.गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात.गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया व मेंदूज्वरासारखे आजार उद्धभवतात.पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते.सदर आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते.गोवर रुबेलाच्या लसीमुळे यामध्ये बरीच सुधारण झाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य