शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदांसाठी आज मतदान

By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST

जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यातूनच नव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सहा जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार

प्रत्येक उमेदवारांना आशा : १७ उमेदवार रिंगणात; पक्षांतर्गत बंडामुळे चुरस वाढलीवर्धा: जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यातूनच नव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सहा जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी दाखल झाल्याच्या तारखेपासून तर मागे घेण्याच्या तारखेपर्यंत लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील वर्धा, सिंदी (रेल्वे), देवळी व आर्वी येथील स्थिती काही प्रमाणात स्पष्ट असली तरी पुलगाव व हिंगणघाट येथे मात्र एका पक्षाचे उमेदवार समोरासमोर आहेत. यामुळे खूर्ची कोणाची हे सांगणे कठीण आहे. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी जाहीर केली. यात सहाही नगर परिषदेत २० जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज परत घेण्याची अंतीम तारीख सोमवारी होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परत घेण्याची वेळ असली तरी केवळ पुलगाव येथील अपक्ष उमेदवार प्रमोद घालाणी व सिंदी (रेल्वे) येथील काँग्रेसच्या अंजली उमाटे यांनी माघार निवडणुकीतून माघार घेतली. यापूर्वीच पुलगावच्या संगीता रामटेके यांचा अर्ज रद्दबातल ठरला होता. पुलगावच्या निवडणुकीत तीन काँग्रेस व एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. या कारणाने चुरस वाढली आहे. हीच स्थिती हिंगणघाट येथे आहे. येथे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या कारणाने येथील गणित स्पष्ट नसल्याचे चित्र आहे. आर्वी येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. येथे आलेले दोनही अर्ज कायम आहेत. यामुळे येथे नगराध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येते ते येथील आजी व माजी आमदाराने केलेल्या मोर्चेबांधणीवर अवलंबून आहे. यात कोण बाजी मारेल हे मंगळवारीच समोर येईल. सिंदी रेल्वे येथेही काँग्रेस व भाजप समोरासमोर असून येथे अपक्ष उमेदवारावर नगगराध्यक्षाची भिस्त आहे. वर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस समोरासमोर आहे. येथे भाजप व राष्ट्रवादीची अभद्र युती यावेळीही कायम राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नगराध्यक्षाची खुर्ची राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, अशी चर्चा आहे. देवळीची स्थिती वेगळी आहे. येथे एकच अर्ज असल्याने निवडणूक अविरोध होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)