शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:38 PM

झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : शासकीय,खासगी रुग्णालये फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजाराची लागण बच्चेकंपनीपासून वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींना होत असून शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.सध्याचे ढगाळी वातावरण हे अनेक आजारांसाठी पोषक ठरणारेच आहे. त्यातच झपाट्याने होणारे वातावरणातील बदल हे विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून त्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजार डोके वर काढत आहेत. त्यातच सध्या व्हायरल फ्ल्यूमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. शहरातील प्रत्येक घरी व्हायरल फ्ल्यूचे एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहे. डोके व अंग दुखी, अंगात थंडी भरून ताप येणे आदी व्हायरल फ्ल्यूची लक्षणे आहेत. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला अंग व डोकेदुचीच्या बेदना सहन कराव्या लागतात. चार ते पाच दिवस असणाऱ्या या तापाचा मुक्काम आता वाढला असून तो आठवड्याभऱ्याचा झाला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे विषाणू संसर्गामुळे होणाºया व्हायरल तापाचे स्वरूप आता बदलले,असे म्हटल्यास वावगे ठरू नये.तापाची लक्षणेसुरूवातीला असह्य असणाऱ्या डोके व अंगदुखीचा त्रास रुग्णाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच रुग्णाला अंगात थंडी भरून ताप येतो. अंगात थंडी भरून आलेला ताप आलटून-पालटून येतो. या तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णाने तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे सांगण्यात येते.तापाचा मुक्काम वाढलाविषाणू संसर्गामुळे होणाऱ्या व्हायरल फ्लूचे स्वरूप आता वेगाने बदलले असल्याचे दिसून येते. यामुळे पूर्वी चार ते पाच दिवस असणाऱ्या तापाचा मुक्काम आता आठ ते दहा दिवसांवर आला आहे. शहरातील वाढते प्रदुषण, विचित्र वातावरण आणि जंतुसंसर्गामुळे वर्धेत या तापाचा जोर वाढला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.व्हायरल फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आपण शनिवारी दुपारी लोकप्रतिनिधींसह खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत व्हायरल फ्लूला अटकाव करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. व्हायरल फ्लूची कुठलीही लक्षणे आढल्यास रुग्णाने घरगुती उपचार न करता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- पुरूषोत्तम मडावी,जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू