ग्रामीणांची भाकर झाली श्रीमंतांची
By Admin | Updated: May 18, 2015 02:04 IST2015-05-18T02:04:57+5:302015-05-18T02:04:57+5:30
कधी काळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर ही हमखास असायची.

ग्रामीणांची भाकर झाली श्रीमंतांची
वर्धा : कधी काळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर ही हमखास असायची. परंतु जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन अत्यल्प होत असल्याने तसेच कार्यक्रमांमध्ये झुनका भाकरीचा टे्रंड वाढल्याने गरिबाची भाकर आता श्रीमंतांची झाली आहे.
स्वादिष्ट आणि पचायला हलकी असणारी व कधीकाळी गरिबांच्या आहारातील भाकर अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात मोठ्या दिमाखात मिरवित असते.
भाकरीची जागा यात काही वर्षात चपातीने घेतलेली आहे. ज्वारीच्या तुलनेत गहू स्वस्त असल्याने व पोळी बनविणेही भाकरीच्या तुलनेत स्वस्त असल्याने महिला वर्गही पोळीलाच पसंती देतो. भारतात हरितकं्राती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जायचे.
कमीत कमी पाणी या पिकाला लागते. ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जातो. परंतु कालांतराने हायब्रीड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला. त्यामुळे ज्वारीची खरी चवही हरविली. तसेच उत्पादन घेणेही कमी झाले. परंतु नाविण्य म्हणून आता ही भाकर वेगवेगळ्या रुपात मोठमोठ्या कार्यक्रमात दिमाखात मध्यभागी दिसते. तसेच आवडीने ती झुनका व ठेच्याबरोबर खाल्ली जाते.
तसेच जिल्ह्यात झुनका भाकर केंद्र नावाने नवा उद्योगही वाढीस लागला असून यात अनेक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.(शहर प्रतिनिधी)