शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

महावितरणविरूद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:49 AM

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी लावून धरली.

ठळक मुद्देग्रामपंचायत कार्यालयात भरविला जनता दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी लावून धरली. एवढ्यावरच थांबले नाही तर उपसरपंचाने समस्या निकाली न निघाल्यास राजीनामा देऊ, असा इशाराच देऊन टाकला. ग्रामस्थांच्या या एल्गारामुळे गावात पूरता गोंधळ निर्माण झाला होता.मांडगाव येथील नागरिक, शेतकरी यांना विद्युत पुरवठ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; पण दोन वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष करीत कनिष्ठ अभियंता पानटपरीवरच वेळ घालवित असल्याचा आरोप नागरिकांनी याप्रसंगी केला. शिवाय त्यांच्या उद्धट स्वभावामुळे ते परिसरात प्रसिद्ध झाले आहेत. जनता दरबारात शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या सरपंच सविता डडमल यांनी जाणून घेतल्या. वीज कंपनीच्या हलगर्जीचा त्यांनाही सामना करावा लागला असून दोन रात्र काळोखात राहावे लागले. आपल्याला कनिष्ठ अभियंत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार सरपंचांनी केली. उपसरपंच प्रमोद डफ यांनी नाराजी व्यक्त करीत जर या समस्या निकाली निघाल्या नाही तर पदाचा राजीनामा देऊ, अशा भाषेत सुनावले. पं.स. सदस्य सुनील डुकरे यांच्याकडे दररोज चार ते पाच तक्रारी येतात. याबाबत त्यांनी अभियंत्याशी चर्चाही केली; पण तक्रारी दूर झाल्या नाहीत. अभियंत्याने प्रत्येक तक्रारकर्त्यासोबत व्यवस्थित बोलावे. कामात सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शेतकºयांनीही आपापल्या समस्या यावेळी मांडल्या.वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने ग्रा.पं. चा पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. ग्रा.पं. साठी स्वतंत्र स्वीच लाईट लावण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी खुद्द आमदारांनी सांगितले होते; पण त्याची चौकशीही केली नाही. लता बानाईत १५ दिवसांपासून अंधारात आहे. तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने खासगी व्यक्तीला पैसे देत दुरूस्ती करून घ्यावी लागली. ओलित सुरू असताना वीज जोडणी कापल्याची तक्रार ज्ञानेश्वर वरवटकर यांनी केली. गावातील डीपी दुरवस्थेत आहेत. सर्व डीपीचे मेन्टनन्स गरजेचे आहे. या सर्व बाबींवर चर्चा करून अभियंता बदलण्याचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी मनोहर पिसे, नारायण पाहुणे, प्रकाश पाहुणे, विजय कुंभलकर, सुनील तडस यासह सर्व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या.३० जूनपर्यंत सर्व समस्या दूर करणार -अधीक्षक अभियंताग्रामस्थांचा रोष पाहून अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे गावात दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत समस्या निकाली काढण्याकरिता उपाययोजना सुचविल्या. कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने पद रिकामे ठेवण्यापेक्षा नवीन नारखेडे यांना ३० तारखेपर्यंत सर्व समस्या दूर करा, अशा सूचना दिल्या. ग्रा.पं. मध्ये तक्रारीसाठी दोन रजिस्टर द्यावे, आठवड्यातून आढावा घ्यावा, एक लाईनमन नियुक्त करून त्याचे नाव, मोबाईल क्रमांकच्या फलकावर लावण्याच्या सूचना दिल्या. ३० जूनला आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पावडे उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज