शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गाव झाली शाळा अन् भिंती झाल्या फळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शानासाठी येतात. त्यामुळे या गावाची एक वेगळी ओळख आहे. गावातील मुलांच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळावी याकरिता प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी ‘आमचे गांव’ हा उपक्रम होती घेतला.

ठळक मुद्देशैक्षणिक उपक्रम : घरांच्या ओसाड भिंती झाल्या बोलक्या, रंगरगोटीने गावाच्या सौंदर्यातही पडली भर

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शाळेतील चार भिंतीआड मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा गावात मिळणारे संस्कार व शिकवण ही फार महत्त्वाची असते. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘गाव ही विश्वाची शाळा’ असे म्हटले आहे. त्यांचे हेच विधान आता शाळा व ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आजनसरा या संत भोजाजी महाराजांच्या जन्मभूमीत सत्यात उतरताना दिसत आहे. येथे ‘आमचं गाव’ या उपक्रमांतर्गत गावातील घरांच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे ओसाड भिंती बोलक्या होऊन गावातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यास मदतगार ठरत आहे.तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शानासाठी येतात. त्यामुळे या गावाची एक वेगळी ओळख आहे. गावातील मुलांच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळावी याकरिता प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी ‘आमचे गांव’ हा उपक्रम होती घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, शिक्षणाची गोडी लागावी आणि सहज सोप्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणातून शिक्षण घेता यावे, यासाठी गावातील घरांच्या भिंती रंगविण्यात आल्या. शाळेच्या परिसरासह गावातील भिंतीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोणातून उपयुक्त असे चित्र, अभ्यासकांचे छायाचित्र, सुत्रे व आकृती रेखाटण्यात आल्या. यामुळे गावाच्या सौदर्यातही भर पडली असून विद्यार्थ्यांना जाता-येता, बसता-उठता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासही मदत होत आहे. त्यामुळे गावच आता शाळा झाले असून गावतील भिंती या फळ्याची कामगिरी बजावत आहे. या नव्या उपक्रमामुळे गावातील चिमुकल्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता भिंतीच वाचायला लागलेगावातील शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी गावातील ओसाड पडलेल्या भिंती चित्राच्या माध्यमातून बोलक्या केल्या आहे. या भिंतीवर चौदाखडी, गणितीय सूत्रे, समीकरणे व अपूर्णांकाच्या आकृती, शाब्दिक उदाहरणे, विषय सोपा परिच्छेद वरून माईंड मॅप, मुळ संख्या, संयुक्त संख्या, रोमन संख्या, मराठी महिने, इंग्रजी महीने, संख्यांचा चार्ट, लिहिण्यासाठी ब्लॅक बोर्ड इत्यादी विषयांसंदर्भात चित्र रेखाटले आहे. आता गावातील मुले हसत-खेळता या भिंती वाचतात. यामुळे गावात शैक्षणिक वातावरणात निर्माण झाले. या शैक्षणिक उपक्रमाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी सरपंच श्रावन काचोळे, उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक तसेच प्रथमचे मोरेश्वर खोंड व गावकºयांचे सहकार्य मिळाले आहे.

टॅग्स :Schoolशाळा