शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 14:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे.

ठळक मुद्देहजारांवर सभाभाजप, काँग्रेसच्या विरोधात वातावरण तापविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे. विदर्भ राज्य द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असा निर्वाणीचा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे. अलीकडेच २ ते १२ जानेवारी या कालावधी विदर्भ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आता ग्रामीण भागात १ हजार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी विदर्भवाद्यांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून आगामी निवडणुकीत विदर्भवाद्यांचे उमेदवारही मैदानात उतरविले जाण्याची शक्यता विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला मूठमाती देण्यात आली. विदर्भाची मागणी दीडशे वर्षांपूर्वीची असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन दिले होते. भाजप व काँग्रेसने अनेकदा स्वतंत्र राज्याबाबत ठरावही पारित केले. मात्र, आपला शब्द पाळला नाही. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने व त्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र राज्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, आता भाजप स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यांपासून दूर गेला आहे, असा आरोप विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सध्या विदर्भ राज्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यांवर नसल्याचा दावा केल्याचे चटप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दुसरीकडे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी आक्रमक झाले असून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत वडनेर, हिंगणघाट, जाम, सावली वाघ आदी भागासह विविध ठिकाणी जाहीर सभा विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने घेतल्या जात आहेत. विदर्भवाद्यांच्या आक्रमकपणामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाची मोठी गोची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे.विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांची लूट थांबणार नाही. दिल्ली, मुंबईच्या नेत्यांना विदर्भाच्या जनतेशी काहीही देणे-घेणे राहिले नाही. महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यामुळे विदर्भाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.अनिल जवादे, उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आघाडी,२०१४ मध्ये विदर्भ राज्य देऊ या मुद्यांवर भाजपचे ४४ आमदार व ६ खासदार निवडून आले. सत्तेवर आल्यावर विदर्भाचा त्यांना विसर पडला. विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राला वीज, कापूस, खनिज मिळणार नाही.नीरज खांदेवाल, विदर्भवादी नेते.

टॅग्स :Electionनिवडणूक