शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 14:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे.

ठळक मुद्देहजारांवर सभाभाजप, काँग्रेसच्या विरोधात वातावरण तापविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे. विदर्भ राज्य द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असा निर्वाणीचा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे. अलीकडेच २ ते १२ जानेवारी या कालावधी विदर्भ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आता ग्रामीण भागात १ हजार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी विदर्भवाद्यांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून आगामी निवडणुकीत विदर्भवाद्यांचे उमेदवारही मैदानात उतरविले जाण्याची शक्यता विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला मूठमाती देण्यात आली. विदर्भाची मागणी दीडशे वर्षांपूर्वीची असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन दिले होते. भाजप व काँग्रेसने अनेकदा स्वतंत्र राज्याबाबत ठरावही पारित केले. मात्र, आपला शब्द पाळला नाही. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने व त्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र राज्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, आता भाजप स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यांपासून दूर गेला आहे, असा आरोप विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सध्या विदर्भ राज्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यांवर नसल्याचा दावा केल्याचे चटप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दुसरीकडे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी आक्रमक झाले असून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत वडनेर, हिंगणघाट, जाम, सावली वाघ आदी भागासह विविध ठिकाणी जाहीर सभा विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने घेतल्या जात आहेत. विदर्भवाद्यांच्या आक्रमकपणामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाची मोठी गोची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे.विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांची लूट थांबणार नाही. दिल्ली, मुंबईच्या नेत्यांना विदर्भाच्या जनतेशी काहीही देणे-घेणे राहिले नाही. महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यामुळे विदर्भाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.अनिल जवादे, उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आघाडी,२०१४ मध्ये विदर्भ राज्य देऊ या मुद्यांवर भाजपचे ४४ आमदार व ६ खासदार निवडून आले. सत्तेवर आल्यावर विदर्भाचा त्यांना विसर पडला. विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राला वीज, कापूस, खनिज मिळणार नाही.नीरज खांदेवाल, विदर्भवादी नेते.

टॅग्स :Electionनिवडणूक