अस्थिर दरांमुळे भाजीपाला उत्पादक संकटात
By Admin | Updated: January 11, 2015 23:04 IST2015-01-11T23:04:20+5:302015-01-11T23:04:20+5:30
रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

अस्थिर दरांमुळे भाजीपाला उत्पादक संकटात
नाचणगाव : रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
नाचणगाव परिसरात ओलीताची सोय असणारे बरेच शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. वांगे, टमाटर, कोथिंबिर, कोबी अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा यात समावेश आहे. रोजचा मजुरीचा खर्च बहळून चांगले उत्पादन व्हावे हा त्यामागील उद्देश असतो. परंतु बदलत्या काळानुसार वाढता बियाणांचा खर्च, सिंचनाचा खर्च, पिकांना मिळत असलेला अत्यल्प भाव यामुळे भाजीपाला उत्पादक वैतागले आहे. भाजीपाला हा दलालामार्फत चिल्लर विक्रेता व नंतर ग्राहक या पद्धतीने पोहचविला जातो. यामध्ये एखाद्या वेलीच चांगला भाव मिळतो. अन्यथा बरेचदा लावलेल्या पिकांचा खर्च सुद्धा निघणे कठीण जाते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सदर भाव स्थिर राहले तर त्याचा फायदा ग्राहक व उत्पादक दोघानाही होईल. त्यामुळे भाज्यांचे भाव स्थीर राहावे अशी अपेक्षा परिसरातील भाजीपाला उत्पादक व्यक्त करीत असतात.(वार्ताहर)