शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

वरुणराजाची दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलाशयातील पाणी पातळीत वाढ : नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यातील आठही तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या आणि मोठ्या तसेच मध्यम जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय काही जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. एकूणच मागील २४ तासांत झालेला पाऊस उभ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे. शिवाय शेतकरीही सुखावला आहे.महाकाळीचा धाम झाला फुल्लखरांगणा (मो.) : नजीकच्या महाकाळी येथील धाम प्रकल्प सततच्या पावसामुळे १०० टक्के भरला आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत असून खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाम नदी पात्रातील पाणी साठा वाढल्याने काचनूर, कासारखेडा, खरांगणा, मोरांगणा या गावात दवंडी देऊन नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.सेवाग्रामात जनजीवन विस्कळीतसेवाग्राम : शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सततचा पाऊस सुरू राहिल्याने चाकरमानी वगळता अन्य नागरिकांना घरातच थांबावे लागले होते. शिवाय बाजारपेठ बंद राहिल्याने रस्तेही निर्मनुष्य होते.कारंजाचा खैरी प्रकल्प भरला १०० टक्केकारंजा (घा.) : तालुक्यातील खैरी प्रकल्प सततच्या पावसामुळे सध्या १०० टक्के भरला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या शेजारील गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी सुखाबला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.१०० वर्षे जुने झाड कोसळलेहिंगणघाट : शुक्रवारी संततधार पावसादरम्यान स्थानिक गांधी वॉर्ड येथील अ‍ॅक्सिस बँक चौकातील १०० वर्षे जुने कडूनिंबाचे डेरेदार वृक्ष कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, प्रा. संदीप रेवतकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, काम कासवगतीने सुरू असतानाच ही घटना घडली. या भागातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.निम्न वर्धा धरणाचे १५ दरवाजे उघडलेदेऊरवाडा/ आर्वी : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा जलाशय ७४ .८१ टक्के भरला असून या धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ६०२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. निम्न वर्धा जलयाशातील पाणी वर्धा नदीत सोडले जात असल्याने या नदी काठावरील धनोडी बहादरपूर, वडगाव पांडे, दिघी (हो.), सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस