शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाची दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलाशयातील पाणी पातळीत वाढ : नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यातील आठही तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या आणि मोठ्या तसेच मध्यम जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय काही जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. एकूणच मागील २४ तासांत झालेला पाऊस उभ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे. शिवाय शेतकरीही सुखावला आहे.महाकाळीचा धाम झाला फुल्लखरांगणा (मो.) : नजीकच्या महाकाळी येथील धाम प्रकल्प सततच्या पावसामुळे १०० टक्के भरला आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत असून खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाम नदी पात्रातील पाणी साठा वाढल्याने काचनूर, कासारखेडा, खरांगणा, मोरांगणा या गावात दवंडी देऊन नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.सेवाग्रामात जनजीवन विस्कळीतसेवाग्राम : शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सततचा पाऊस सुरू राहिल्याने चाकरमानी वगळता अन्य नागरिकांना घरातच थांबावे लागले होते. शिवाय बाजारपेठ बंद राहिल्याने रस्तेही निर्मनुष्य होते.कारंजाचा खैरी प्रकल्प भरला १०० टक्केकारंजा (घा.) : तालुक्यातील खैरी प्रकल्प सततच्या पावसामुळे सध्या १०० टक्के भरला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या शेजारील गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी सुखाबला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.१०० वर्षे जुने झाड कोसळलेहिंगणघाट : शुक्रवारी संततधार पावसादरम्यान स्थानिक गांधी वॉर्ड येथील अ‍ॅक्सिस बँक चौकातील १०० वर्षे जुने कडूनिंबाचे डेरेदार वृक्ष कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, प्रा. संदीप रेवतकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, काम कासवगतीने सुरू असतानाच ही घटना घडली. या भागातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.निम्न वर्धा धरणाचे १५ दरवाजे उघडलेदेऊरवाडा/ आर्वी : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा जलाशय ७४ .८१ टक्के भरला असून या धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ६०२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. निम्न वर्धा जलयाशातील पाणी वर्धा नदीत सोडले जात असल्याने या नदी काठावरील धनोडी बहादरपूर, वडगाव पांडे, दिघी (हो.), सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस