शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

अवकाळी पावसाने ७,४४५ शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला.

ठळक मुद्दे३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने ७ हजार ४४५ शेतकऱ्यांच्या एकूण ३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आलेली नाही.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला. हे नुकसान ६४ हजार ८०० रुपयांच्या घरात असल्याने सदर रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १०३ शेतकऱ्यांचे ४१.७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसान ६ लाख २७० रुपयांच्या घरात असून या रक्कमेची मागणीही जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. गत तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे एकूण ७ हजार ४४५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून नुकसान भरपाईपोटी मागणी करण्यात आलेल्या ४ कोटी ५० लाख ६९ हजार ७४४ रुपयांचा निधीच शासनाने वर्धा जिल्हा प्रशासनाला दिला नसल्याने शेतकरीही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निधी वेळीच वर्धा जिल्हा प्रशासनाला देणे गरजेचे आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी