शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

अवकाळीचा कहर, गारपिटीने जनावरांचा मृत्यू; देवळी तालुक्यामध्ये ४० खांब लोळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:36 IST

दोन बैलजोड्यांसह ६१ मेंढ्या गतप्राण, झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित

वर्धा : जिल्ह्यात कडक उन्ह तापत असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण व वादळी पावसाची ये-जा सुरू आहे. अशातच बुधवारच्या रात्रीला जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर, सेलू व वर्धा यासह इतरही तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात हजेरी लावत दाणादाण केली आहे.

विजेच्या कडकडाटासह वादळीपाऊस बरसल्याने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. यात वीज पडल्याने सेलू तालुक्यातील गोदापूर आणि समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील दोन बैलजोड्या गतप्राण झाल्या. तसेच देवळी तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथे विजेमुळे शेतात असलेल्या ६१ मेंढ्या ठार झाल्या. यासोबतच विद्युत खांब वाकल्याने अंधारातच रात्र काढावी लागली. मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने वाहतूकही खोळंबली होती तर घरावरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

बैलजोडी दगावल्याने दीड लाखांचे नुकसान

समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्ता येथील फकीरवाडी शिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज पडल्याने बैलजोडी ठार झाली. यात शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले असून, ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुनील वसंता सराटे यांची फकीरवाडी शिवारातील शेतामध्ये झाडाखाली बैलजोडी बांधून होती. बुधवारी रात्रीला मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अशातच वीज पडल्याने बैलजोडी दगावली. गुरुवारी सकाळी शेतात गेल्यानंतर बैलजोडी मृतावस्थेत दिसून आली. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

चिखलीत झाड पडल्याने बत्ती गुल

चिकणी गावासह परिसरामध्ये बुधवारी रात्री अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. विजांच्या कडकडाटासह वादळाने चांगलीच दाणादाण झाली होती. अशातच चिखली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये अविनाश बिरे व गजानन डायरे यांच्या घराजवळील झाड विद्युत तारांवर पडल्याने रात्रभर गावातील बत्ती गुल होती. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. बराच वेळ चाललेल्या या वादळ व विजेच्या कडकडाटाने सारेच भयभीत झाले होते. विद्युत तारांवर झाड पडल्यानंतर तत्काळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

गोंदापुरात वीज कोसळून बैलजोडी ठार

कडुनिंबाच्या झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडीवर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले. ही घटना गोंदापूर शेतशिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे जवळपास ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रेहकी येथील शेतकरी सतीश नामदेवराव शिंदे यांची समृद्धी महामार्गालगत गोंदापूर शिवारात शेती आहे. बुधवारला सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने बैलजोडी कडुनिंबाच्या झाडाखाली बांधून ठेवली होती. रात्री बारा वाजताच्या सुमारास अवकाळी पावसादरम्यान विजांचाही कडकडाट सुरू झाला. यावेळी बैलजोडीवर वीज पडल्याने ती जागीच गतप्राण झाली. गुरुवारी सकाळी सालगडी शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

आर्वीत वादळी पावसाने उडविली नागरिकांची त्रेधातिरपीट

बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने आर्वीकरांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली होती. घरावरील टीनाच्या छतासह फलकही उडाले. झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

आर्वी शहरातील देऊळकर लेआउट येथील प्रवीण उत्तमसिंग चव्हाण यांच्या घरावरील १६ फुटांचे सहा टीनपत्रे अँगलसह उडाले आणि संभाजीनगरात राहणाऱ्या प्राचार्य साहेबराव अवथळे यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांना अडकले. त्या घरी खाली तीन ते चार मुले खेळत होती. परंतु टीनपत्रे तारांना अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यात प्रवीण चव्हाण यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. या वादळाने संभाजीनगर, संतोषी माता मंदिर परिसर, शिरपूर रोड, कन्नमवारनगर, अंतरडोह पुनर्वसन, आर्वी-तळेगाव मार्गावरील विद्युत तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला होता. संभाजीनगरात तसेच इतर ठिकाणी तीन-चार झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने छोटू महेश कडू, विनोद पारधी, सचिन गोडबोले, अक्षय हिवाळे व अरविंद सतीमेश्राम आदींनी नागरिकांना अंधाराचा त्रास होऊ नये, यासाठी तातडीने जम्पर, तारा तुटलेल्या तारा व्यवस्थित करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

विद्युत खांब जमिनदोस्त, देवळी तालुका अंधारात

देवळी तालुक्यातील अडेगाव, दापोरी, कोल्हापूर (सिंगरवाडी), आंजी, अंदोरी, चिखली, पिंपळगाव (लुटे), गौळ तसेच परिसरतील गावाला वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. काही गावात गारपीटही झाल्याने उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर, तसेच ४० खांब जमीनदोस्त होऊन १५ लाखांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान तालुक्यात हा कहर अनुभवायला आला.

बुधवारी सायंकाळी देवळी व परिसरातील गावात वादळी पावसाला सुरुवात झाली. काहीवेळासाठी उसंत दिल्यानंतर साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान काही गावांना वादळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले. यादरम्यान वीज पडल्याने अंदोरी येथील राजू डगवार यांच्या शेतात बसविलेल्या मेंढ्यांच्या कळपातील ६१ मेंढ्या गतप्राण झाल्या. तसेच अडेगाव, गौळ, कोल्हापूर (सिंगरवाडी) आदी गावात झाडे पडली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारासाठी परिसरात फिरणारी वाहने अडकून पडली. यातील काही वाहने जेसीबीच्या सहाय्याने काढण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत कसरत करावी लागली. कोल्हापुरातील विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह खाली पडले. तसेच ११ केव्हीचे १२ खांब तुटून पडले. भिडी व गिरोली भागात शेतातील पंपाची एलटी वाहिनी तुटून पडली. यासोबतच ३८ खांब जमिनदोस्त झाले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. मागील दोन दिवसांपासून या भागात वादळी पाऊस सुरू आहे. यामध्ये शेतातील उन्हाळी सोयाबीन, तीळ तसेच फळभाज्यांचे पीक मातीमोल झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसHailstormगारपीटthunderstormवादळwardha-acवर्धा