तुरीच्या पिकावर अज्ञात आजाराचा विळखा
By Admin | Updated: January 1, 2015 23:06 IST2015-01-01T23:06:07+5:302015-01-01T23:06:07+5:30
तूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण सुरू झाल्याने ऐन भरात आलेले तुरीचे उभे पीक शेतातच वाळत आहे. अशात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातवारणामुळे तुरीच्या पिकांना उद्भवणाऱ्या धोक्यात वाढ झाली

तुरीच्या पिकावर अज्ञात आजाराचा विळखा
आर्वी : तूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण सुरू झाल्याने ऐन भरात आलेले तुरीचे उभे पीक शेतातच वाळत आहे. अशात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातवारणामुळे तुरीच्या पिकांना उद्भवणाऱ्या धोक्यात वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. या दोन्ही संकटासह तुरीवर शेंगा पोखरणारी अळी जोर करीत असल्याने उत्पन्न धोक्यात आले आहे.
तालुक्यात एकूण ८०० हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. गत काही दिवसांपासून शेतात असलेले तुरीचे उभे वाळत आहे. यामुळे तुरीचे उत्पन्नही धोक्यात आले आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिली असली तरी त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना सांगण्यात आल्या नाहीत.
गत आठ दिवसांपासून तालुक्यातील वाठोडा, वागदा, अल्लीपूर, बेढोणा, पिंपळखुटा, वर्धमनेरी, जळगाव, खुबगाव, बाजारवाडा, नांदपूर, कर्माबाद, निंबोली, इठलापूर, सर्कसपूर, माहेरवाडा, लाडेगाव यासह अनेक गावातील तुरीचे पीक वाळत आहे. या अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)