शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ट्रक दुचाकीच्या दोन अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:22 IST

देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली.

ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी : भिडी व कारंजा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/कारंजा (घा.) : देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे.भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही दोन्ही वाहने यवतमाळकडून देवळीच्या दिशेने येत होते. या अपघातात दुचाकीचालक अविनाश राऊत (२८) रा. मुरदगाव (येसगाव) हा युवक ट्रकच्या चाकात येवून जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेले त्याची मामी शालिनी सोनवणे (४०) रा. नाचणगाव ही गंभीर जखमी झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.कारंजा (घा.) येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.गणेश नामदेव येरपुडे (३२) असे मृतकाचे नाव असून विलास वामन कुमेरिया (२७) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही जऊरवाडा (खुर्द) येथील रहिवासी असून एम.एच. ३२ डब्ल्यू ९५५६ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजा येथील गोळीबार चौकातून कारंजा मार्केटकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाने नागपुरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या सी.जी. ०४ जे.डी.५०५६ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत गणेशच्या पायावरुन ट्रक गेल्याने गुडघ्यापासून पाय वेगळा झाला.तसेच विकासही गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपुरकडे रवाना केले. परंतु नागरपुच्या मेडीकल हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. तर विकासवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चालकाला अटक करुन ट्रक जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू