शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथील एका महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन मोड’वर कामाला गती दिली. महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका व नगपंचायत प्रशासन आदींनी या कोरोना युद्धात स्वत:ला झोकून दिले आहे.

ठळक मुद्देदीड वर्षाच्या लढ्यात गावकऱ्यांना यश : शहरातच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचे संकट गंभीर होत असतानाही जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच आपली तहानभूक विसरून खंबीरपणे लढा  चालविला आहे. आता दीड वर्षापासून कोरोनासोबत दोन हात सुरू असूनही नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांकडून वेळोवेळी मिळालेले सहकार्य, यामुळे अद्यापही तब्बल २२७ गावांमध्ये कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथील एका महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन मोड’वर कामाला गती दिली. महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका व नगपंचायत प्रशासन आदींनी या कोरोना युद्धात स्वत:ला झोकून दिले आहे. पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह शिक्षक आदी १५ लाख ७८ हजार लोकसंख्येच्या आरोग्यासाठी लढा देत आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाली तर काहींनी जीवही गमवला. शिथिलतेनंतर झालेला गाफीलपणा भोवल्याने जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावांमध्ये कोरोनाला घरोबा करण्यास संधी मिळाली. तरीही तब्बल २२७ गावांमध्ये कोरोना वेशीवर येऊन थांबला असून त्याला अद्यापही गावात एंट्री मिळाली नसल्याने या गावांच्या नियोजनाला सलामच करावा लागेल.

आधी रुग्ण आढळला पण सध्या शुन्यावरग्रामीण भागातून कोरोनाचा शिरकाव झाला असला तरीही शहरी भागातच रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले पण, त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे बहुतांश गावातील रुग्ण संख्या शुन्यावर असल्याचे दिसून येत आहे.

आरंभा आणि मांगली या दोन गावांमिळून गट ग्रामपंचायत असून दोन्ही गावातील लोकसंख्या पंधराशेच्या आसपास आहे. कोरोनाकाळात सुरुवातीला गावातून बाहेर जाणारे आणि बाहेर गावातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले. सोबतच जाणे-येणे टाळण्याचे नागरिकांना आवाहन केल्याने नागरिकांनी सहकार्य केले. गावात सॅनिटायरचा वापर, नियमित फवारणी केली. त्यासोबत आशा वर्कर्स यांचेही मोठे सहकार्य मिळाले.  ईश्वर सुपारे, सरपंच, आरंभा 

आमचे गाव वर्धा-यवतमाळ मार्गावर असून गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहेत. सुरुवातीला बाहेर गावावरुन येणाऱ्यांवर वॉच ठेवला. जिल्ह्यात पहिला दंड आम्ही वसूल केला. यवतमाळवरुन आलेल्या तिघांसह घरमालक अशा चौघांकडून आठ हजार रुपये दंड वसूल केला. आताही बारकाईने लक्ष ठेऊन शासनाच्या नियमावलीचे पालन केले जात असल्याने अद्यापही एकही रुग्ण आढळला नाही.रविंद्र भानारकर, सरपंच, शिरपूर (होरे) 

तारासावंगा ग्रा.पं.मध्ये २ हजार २०० रुग्णसंख्या असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरुवातीपासून विविध उपाययोजना करण्यात आल्या. प्रारंभी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांकरिता नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच गावकऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. सामाजिक अंतर पाळण्यासोबतच मास्कचा नियमित वापर करण्यास नागरिकांना सूचित केले. परिणामी अद्याप गावात एकही व्यक्ती कोरोनाबाधित झालेला नाही.शीतल गोविंद खंडाळे, सरपंच, तारासावंगा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या