शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे तुरीच्या झाल्या तुराट्या, शेतकऱ्यांवर ओढवले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:18 IST

सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येत आहे.

ठळक मुद्देउभी पिके लागली वाळू :  गावगाड्यात चर्चा

वर्धा : वातावरणात झालेल्या बदलामुळे उभे तूर पीक वाळू लागल्याने तुरीच्या तुराट्या झाल्या हो...अशीच चर्चा आता गावोगाव खेड्यात होताना दिसून येत आहे.

बोंडअळी व बोंडसडमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तरी भाव बरे मिळत असल्याने काही प्रमाणात तोटा भरून निघाला. तुरीचे उत्पन्न फायद्याचे होईल, अशी शेतकऱ्याला आशा होती. मात्र, सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येते. यावर नेमकी काय उपाययोजना करावी, याची शेतकऱ्याला माहिती नाही. तुरीचे पीक खर्च केल्यानंतर हातचे जाईल या भीतीने शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत दिसून येत आहे.

शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी असलेला कृषी विभागही याकडे कानाडोळा करीत असून विभागालाही नेमकी जिल्ह्याची स्थिती माहीत नसल्याचे दिसून येते. एका कृषी सहायकावर दहा दहा गावांचा भार असल्याने तेसुद्धा एका गावाला न्याय देऊ शकत नाहीत. शेतकऱ्याला या अस्मानी संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

चार दिवसांपूर्वी तूर चांगली होती. चांगला फुलोराही होता, काही शेंगादेखील पकडल्या होत्या. परंतु, अचानक काही झाडं वाळायला सुरुवात झाली व दोन दिवसांत लॉट सुकलेला दिसत आहे. काय उपाययोजना करावी कळत नाही.

-सुरेश इखार, पवनार.

वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तूर सुकताना दिसत आहे. हा रोग पसरू नये म्हणून एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची ताबडतोब ड्रेचिंग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सदर उपाययोजना करावी.

-परमेश्वर घायतिडक, तालुका कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसweatherहवामान