शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम ते आष्टा फाटा : हिरवळीअभावी मार्ग ओसाड; पर्यावरणप्रेमीत व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध योजनांच्या नावाखाली वृक्षलागवडीचा देखावा आणि दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरणाऱ्या डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड, असा उफराटा प्रकार तत्कालीन सरकारच्या काळापासून जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संतापाची लाट आहे.सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि बांधकाम केले जात आहे. हा रस्ता वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट एसीसी कंपनीला मिळाला आहे. सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत यापूर्वी दुतर्फा असलेल्या वृक्षराजीमुळे चांगली हिरवळ दाटलेली होती. रस्ता बांधकामात अडसर ठरल्याने ५० ते १०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रजातींच्या हजारावर डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या मार्गाने गेले असता दुतर्फा तोडलेली झाडे पडलेली दृष्टीस पडत असून हे चित्र संताप आणणारे ठरत आहे.मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे.बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली. तसेच शहरातील दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतही रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण झाले. या सर्वच कामात आड येणाºया डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली. त्यामुळे एकेकाळी हिरवेपण असलेले हे मार्ग आज ओसाड झाले आहेत.प्रशासनाकडून संबंधित मार्गांलगत वृक्षलागवड करण्यात येईल, असे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा काळ लोटूनही वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. याकडे शासन आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड थांबवावी अथवा विकासकामांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.विकासकामे थांबवासेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षांचा बळी घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्गही ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. शासन वृक्षलागवडीकरिता विविध योजना राबवित असले तरी वृक्षतोडीच्या प्रमाणात लागवड नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असा जीवघेणा विकास नको, असा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करणारी विकासकामे थांबवावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग