शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

विकासात अडसर ठरलेल्या वृक्षांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम ते आष्टा फाटा : हिरवळीअभावी मार्ग ओसाड; पर्यावरणप्रेमीत व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध योजनांच्या नावाखाली वृक्षलागवडीचा देखावा आणि दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरणाऱ्या डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड, असा उफराटा प्रकार तत्कालीन सरकारच्या काळापासून जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संतापाची लाट आहे.सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि बांधकाम केले जात आहे. हा रस्ता वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट एसीसी कंपनीला मिळाला आहे. सेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत यापूर्वी दुतर्फा असलेल्या वृक्षराजीमुळे चांगली हिरवळ दाटलेली होती. रस्ता बांधकामात अडसर ठरल्याने ५० ते १०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रजातींच्या हजारावर डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या मार्गाने गेले असता दुतर्फा तोडलेली झाडे पडलेली दृष्टीस पडत असून हे चित्र संताप आणणारे ठरत आहे.मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे.बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण पूर्णत्वास गेले. या मार्गाच्या बांधकामावेळीही हजारांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली. तसेच शहरातील दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतही रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण झाले. या सर्वच कामात आड येणाºया डेरेदार वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली. त्यामुळे एकेकाळी हिरवेपण असलेले हे मार्ग आज ओसाड झाले आहेत.प्रशासनाकडून संबंधित मार्गांलगत वृक्षलागवड करण्यात येईल, असे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा काळ लोटूनही वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. याकडे शासन आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड थांबवावी अथवा विकासकामांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.विकासकामे थांबवासेवाग्राम ते आष्टा फाट्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षांचा बळी घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्गही ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. शासन वृक्षलागवडीकरिता विविध योजना राबवित असले तरी वृक्षतोडीच्या प्रमाणात लागवड नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असा जीवघेणा विकास नको, असा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करणारी विकासकामे थांबवावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग