शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देरेल्वेवर अवलंबून घटकांची होतेय उपासमार : प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा कायम

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना सक्तीने घरी राहावे लागले. काहींनी घरुन काम सुरु केले. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कामगार आणि मजुरांचे झालेले हाल आजतागायत कायम आहेत. लाखो लोकांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रेल्वेस्थानकांवर अजूनही हजारो हातांना कामाची प्रतीक्षा आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे. वर्धा रेल्वे जंक्शनवरुन लॉकडाऊनपूर्वी अनेक प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असायची. मात्र, लॉकडाऊन लागल्याने एरव्ही प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर आज घडीला निरव शांतता दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्यांवर मात्र, उपासमारीची वेळ आली असून अनेक हमाल आपल्या स्वगावी कामाच्या शोधात परतले आहे.फलाटावरील विक्रेत्यांवर आली उपासमारकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे वर्धा रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्धा रेल्वेस्थानकावर दररोज २० ते २२ प्रवासी रेल्वे गाड्यांची ये-जा असते.स्थानकावरील फलाटांवर सुमारे ३० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे राहून कुटुंबीयांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा, दोन पैसे मिळावे, यासाठी डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे. मात्र, २३ मार्च पासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकात गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.जीवनावश्यक वस्तूंची मदत द्यावीउदरनिर्वाह कसा चालवावा, याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे हमाल, रिक्षाचालक, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.विशेषत: ज्या मक्तेदाराकडे मजूर कामावर होते त्यांनी निदान या परिस्थितीत त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे