शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देरेल्वेवर अवलंबून घटकांची होतेय उपासमार : प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा कायम

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना सक्तीने घरी राहावे लागले. काहींनी घरुन काम सुरु केले. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कामगार आणि मजुरांचे झालेले हाल आजतागायत कायम आहेत. लाखो लोकांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रेल्वेस्थानकांवर अजूनही हजारो हातांना कामाची प्रतीक्षा आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे. वर्धा रेल्वे जंक्शनवरुन लॉकडाऊनपूर्वी अनेक प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असायची. मात्र, लॉकडाऊन लागल्याने एरव्ही प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर आज घडीला निरव शांतता दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्यांवर मात्र, उपासमारीची वेळ आली असून अनेक हमाल आपल्या स्वगावी कामाच्या शोधात परतले आहे.फलाटावरील विक्रेत्यांवर आली उपासमारकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे वर्धा रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्धा रेल्वेस्थानकावर दररोज २० ते २२ प्रवासी रेल्वे गाड्यांची ये-जा असते.स्थानकावरील फलाटांवर सुमारे ३० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे राहून कुटुंबीयांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा, दोन पैसे मिळावे, यासाठी डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे. मात्र, २३ मार्च पासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकात गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.जीवनावश्यक वस्तूंची मदत द्यावीउदरनिर्वाह कसा चालवावा, याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे हमाल, रिक्षाचालक, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.विशेषत: ज्या मक्तेदाराकडे मजूर कामावर होते त्यांनी निदान या परिस्थितीत त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे