महिनाभरात प्रवासात बंद पडल्या ६० बसगाड्या
By Admin | Updated: May 23, 2014 00:06 IST2014-05-23T00:06:11+5:302014-05-23T00:06:11+5:30
रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे.

महिनाभरात प्रवासात बंद पडल्या ६० बसगाड्या
रूपेश खैरी - वर्धा
रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे. प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याची सरासरी काढल्यास रोज दोन बसगाड्या बंद पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. सुरक्षित प्रवासाकरिता परिवहन विभाग, असे म्हटल्या जाते; मात्र परिवहन विभागाच्या बसगाड्या भंगार झाल्याने हे ब्रीद आता खोटे ठरू लागले आहे. प्रवासी घेवून निघालेली परिवहन विभागाची बसगाडी ठरलेल्या वेळी ठरलेले अंतर कापून नियोजित गावी पोहोचेल याचा कुठलाही नेम राहिला नाही. परिवहन विभाच्या बसगाड्या रस्त्याने बंद पडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करीत पायदळ गाव गाठावे लागत आहे. रस्त्याने प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याचा फटका परिवहन विभागालाही बसला आहे. याच कारणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात परिवहन विभागाच्या बसगाड्यांचा होणारा प्रासंगिक करार कमी होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन विभागाचा कारभार सुरू आहे. या पाचही आगारातील गाड्यांची दैना झाल्याने त्याचा त्रास बसगाड्यांतून प्रवास करणार्यांना अधिक बसत आहे. बसच्या कोणत्या खिडकीला काच नाही, आसन व्यवस्था नाही, बसचे बरेच भाग पडलेले असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. याचा फटका परिवहन विभागाला बसला असून वर्धा आगाराच्या अनेक बसगाड्यांना उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालान देण्यात आले आहेत. गाड्या चालान करण्याच्या प्रकरणात विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात एका अधिकार्याला निलंबितही व्हावे लागले. असे असले तरी यातून विभागाच्या अधिकार्यांनी या अधिकार्याच्या पाठीशी राहून त्याचे निलंबन रद्द केले. विभागाच्या पाठीशी एवढा अनुभव असतानाही वर्धा परिवहन विभागाच्या अधिकार्यांकडून यातून कुठलाही धडा घेतला नाही. बसगाड्या रस्त्याने बंद पडण्याचा प्रकार सुरूच आहे. हा प्रकार वर्धा विभागाच्या अधिकार्यांना माहिती असून या भंगार बसगाड्या अजूनही रस्त्यावर धावतच आहेत.