शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

सरकार विरोधातील लढा तीव्र करण्याची वेळ

By admin | Updated: July 11, 2015 02:41 IST

सध्याचे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

आमरा राम : अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय कमिटीची सेवाग्राम यात्री निवासात बैठकसेवाग्राम : सध्याचे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. निवडणुकी अगोदर दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. सरकारची धोरणेच आता शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने सरकारला जागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार आमरा राम यांनी शुक्रवारी यात्री निवास मधील बैठकीत कार्यकर्त्यांसमोर मांडले.अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय कमिटीची बैठक आजपासून यात्री निवास येथे सुरू झाली. यावेळी माजी खासदार हन्नन मोल्ला, उपाध्यक्ष एस. आर. पिल्ले, खासदार जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष मदन घोष, के. वरदान, एस. मालारेड्डी, सहसचिव एन. के. मुल्ला, बिजू क्रिष्णण, अशोक ढवळे, चौधरी, वित्त सचिव पी. क्रिष्णा प्रसाद आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये किसान सभेच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आंदोलने व चळवळींबाबतच्या प्रगतीची वाटचाल लक्षात घेवून सरकारच्या धोरणावर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या सहकार्याने लढा अधिक तीव्र कसा करता येईल यावर विचारमंथन व चर्चा करण्यात आली. तसेच किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. देशभरातील शंभरावर प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. होते. वर्धेचे डॉ. अशोक ढवळे, यशवंत झाडे हे देखील यावेळी उपस्थित होते. आणखी दोन दिवस येथील बैठकीत विचारमंथन होणार आहे.(वार्ताहर)