शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आधी दगडाने ठेचले नंतर कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 11:58 IST

हिंगणघाटात थरार, जुन्या वादातून घटना : चारही आरोपींना ठोकल्या बेड्या

हिंगणघाट (वर्धा) : जुन्या वादाचा वचपा काढत तरुणावर चौघांनी जीवघेणा हल्ला चढवून कुऱ्हाडीने सपासप वार करीत त्याची हत्या केल्याची घटना शहरातील शास्त्री वॉर्ड येथील किसन जिनिंग समोरील रस्त्यावर ४ रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणातील दोन आरोपींना काल रात्री तर दोघांना आज ५ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीकांत उर्फ गजू श्रावण खंगार (३३ रा. मुजुमदार वॉर्ड) असे मृतकाचे नाव आहे. मृतक श्रीकांत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांकडून यापूर्वी करण्यात आल्या होत्या. काही महिन्यापूर्वी तो एका गंभीर गुन्ह्यातून तुरुंगातून बाहेर आला होता. मुजुमदार वाॅर्डातील गंगा माता मंदिर परिसरातील नागरिकांनाही तो त्रास द्यायचा.

४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी मयूर सदाशिव कोराटे(२५), बंटी उर्फ लाल्या गजानन खडसे (२४), सचिन छत्रीया (२०), प्रशांत उर्फ गोलू राऊत यांचा मृतक गजूसोबत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चौघाही आरोपींनी मृतक गजू याला दगडाने व कुऱ्हाडीने मारहाण करून डोक्यावर कुऱ्हाड व दगडाने वार करून त्याचे डोके ठेचले. यामध्ये श्रीकांत उर्फ गजू खंगार याचा जागीच मृत्यू झाला.

याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्याकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा