शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीनदा फुलले ‘कमळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:51 IST

वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबजाज, साठे, मेघेंसारख्या दिग्गजांना मिळाली संधी : राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.स्वातंत्र्य लढ्याला सेवाग्राम येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी दिशा देण्याचे काम केले. त्यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची ख्याती देशात आहेच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने पक्षांतर्गत प्रायमरी निवडणूक घेऊन तळागाळातील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा कौल जाणून घेतला होता. व त्यातून उमेदवार निवडला. काँग्रेसचे सागर मेघे व भाजपचे रामदास तडस यांच्यात सामना झाला. मात्र, प्रत्यक्ष एकूण मतदानापैकी ५३.०४ टक्के मत घेत भाजपचे रामदास तडस विजयी झाले. या निवडणुकीनंतर दत्ताजी मेघे पुत्रासह काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झाले. त्यामुळे त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय समिकरणेच बदलली. याचा परिणामही विधानसभेच्या निवडणुकीवर दिसून आला. सुरूवातीच्या १९५१ ते १९८९ या निवडणुका काँग्रेसने सहजपणे जिंकल्या. बाहेरचे अनेक उमेदवार वर्ध्यातून निवडून गेलेत. सुरुवातीच्या चार निवडणुकीत बजाज परिवारातील उमेदवारालाच मतदारांनी पसंती दिली.पहिली लोकसभा निवडणूक वर्धा मध्यप्रदेश (वऱ्हाड) प्रांतात असताना झाली. त्यानंतर मुंबई प्रातांत असताना १९५७ मध्ये काँग्रेसला कौल मिळाला. जमनालाल बजाज सलग तीनवेळा वर्धेचे खासदार राहिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्ली दरबारी वर्ध्याचे प्रतिनिधित्व केले.दोघांना मिळाली तीनदा संधीकमलनयन बजाज आणि वसंत साठे या दोन काँग्रेस नेत्यांना वर्धा मतदार संघाने सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिले. वसंत साठे अकोला मतदारसंघ सोडून वर्ध्यात लढण्यासाठी आले होते. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साठे विजयी झाले. त्यानंतर वर्धेकरांनी कधीही सलग संधी कुणालाही दिली नाही. मात्र, दत्ताजी मेघे यांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली. रामटेक मतदारसंघ सोडून मेघे थेट वर्ध्यात लढले व जिंकलेही.