शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीनदा फुलले ‘कमळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:51 IST

वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबजाज, साठे, मेघेंसारख्या दिग्गजांना मिळाली संधी : राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.स्वातंत्र्य लढ्याला सेवाग्राम येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी दिशा देण्याचे काम केले. त्यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची ख्याती देशात आहेच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने पक्षांतर्गत प्रायमरी निवडणूक घेऊन तळागाळातील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा कौल जाणून घेतला होता. व त्यातून उमेदवार निवडला. काँग्रेसचे सागर मेघे व भाजपचे रामदास तडस यांच्यात सामना झाला. मात्र, प्रत्यक्ष एकूण मतदानापैकी ५३.०४ टक्के मत घेत भाजपचे रामदास तडस विजयी झाले. या निवडणुकीनंतर दत्ताजी मेघे पुत्रासह काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झाले. त्यामुळे त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय समिकरणेच बदलली. याचा परिणामही विधानसभेच्या निवडणुकीवर दिसून आला. सुरूवातीच्या १९५१ ते १९८९ या निवडणुका काँग्रेसने सहजपणे जिंकल्या. बाहेरचे अनेक उमेदवार वर्ध्यातून निवडून गेलेत. सुरुवातीच्या चार निवडणुकीत बजाज परिवारातील उमेदवारालाच मतदारांनी पसंती दिली.पहिली लोकसभा निवडणूक वर्धा मध्यप्रदेश (वऱ्हाड) प्रांतात असताना झाली. त्यानंतर मुंबई प्रातांत असताना १९५७ मध्ये काँग्रेसला कौल मिळाला. जमनालाल बजाज सलग तीनवेळा वर्धेचे खासदार राहिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्ली दरबारी वर्ध्याचे प्रतिनिधित्व केले.दोघांना मिळाली तीनदा संधीकमलनयन बजाज आणि वसंत साठे या दोन काँग्रेस नेत्यांना वर्धा मतदार संघाने सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिले. वसंत साठे अकोला मतदारसंघ सोडून वर्ध्यात लढण्यासाठी आले होते. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साठे विजयी झाले. त्यानंतर वर्धेकरांनी कधीही सलग संधी कुणालाही दिली नाही. मात्र, दत्ताजी मेघे यांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली. रामटेक मतदारसंघ सोडून मेघे थेट वर्ध्यात लढले व जिंकलेही.