साक्षीदारांना धमकावून बळजबरीने घेतला अंगठा
By Admin | Updated: May 24, 2014 23:51 IST2014-05-24T23:51:30+5:302014-05-24T23:51:30+5:30
पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार वर्धापूरकर

साक्षीदारांना धमकावून बळजबरीने घेतला अंगठा
वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार वर्धापूरकर यांनी साक्षीदारांना धमकावून बळजबरीने अंगठा घेतला. या प्रकरणी फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी रसुलाबाद येथील आकाश मेश्राम याने पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून केली आहे. आकाश मोतीराम मेश्राम रा. रसुलाबाद पो.स्टे. पुलगाव याने अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्याचे वडील मोतीराम मेश्राम रा. रसुलाबद यांना गैरअर्जदार राजेराम वासनिक, कमलाबाई वासनिक, भीमराव वासनिक, दिगांबर बांबर्डे, निर्मला बांबर्डे, सोनाली बांबर्डे आदींनी बेदम मारहाण केली. यामुळे त्यांचा २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. याबाबत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. यावरून आदेशानुसार मातीत पुरलेला मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हापासून पुलगाव पोलिसांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. सदर प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने बिट जमादार वर्धापूरकर यांनी २१ मे रोजी साक्षीदार अरुणा उईके यांच्या घरी जावून त्यांना धमकाविले. किचनमध्ये नेऊन त्यांच्या हाताचा निशाणी अंगठा घेतला. तुम्ही काय लिहिले, हे वाचण्याकरिता मी कुणाला तरी बोलविते, असे म्हटल्यावर कुणाला बोलविण्याची गरज नाही, असे म्हणून त्यांनी कागद बॅगमध्ये ठेवला. यावरून वर्धापूरकर यांनी पैशाची देवाण-घेवाण केली असावी व वरिष्ठ अधिकार्यांना चुकीची माहिती पुरवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आकाशने केला आहे. पोलिसांनी प्रकरण दडपणे योग्य नाही. यामुळे अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून चौकशी करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आकाश मेश्राम व त्याच्या कुटुंबियांनी तक्रारीत केली आहे.(शहर प्रतिनिधी)