तीन चोऱ्यांमध्ये ४९ हजारांचा माल लंपास
By Admin | Updated: June 21, 2014 01:58 IST2014-06-21T01:58:59+5:302014-06-21T01:58:59+5:30
शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़...

तीन चोऱ्यांमध्ये ४९ हजारांचा माल लंपास
वर्धा : शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ तीनही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरात तसेच परिसरात घडल्या़
जुनी म्हाडा कॉलनी परिसरातील मारोती बाबा समाधीजवळ असलेल्या कांता मुंजेवार यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरूवारी घडली. मुंजेवार बाहेरगावी गेल्या असताना चोरट्याने मागील दाराची कडी तोडून कपाटातील सोन्याची पोत, गोफ, अंगठी, चांदीचे भांडे व रोख २ हजार रुपये असा २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या चोरीत रोहणी ते शिरपूर रोडवर असलेल्या सायकल पंक्चरच्या दुकानात ठेवलेल्या पेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली़ याबात वसीम अंसारीच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी भादंविच्या कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला़ वसीम दुकानात झोपून असताना ही घटना घडली़ तिसरी चोरी पालोरा शिवारात घडली़ यात राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ६ वरील पालोरा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकमधून चोरट्यांनी औषधी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला. रामेश्वर विश्वकर्मा हे नागपूर येथून अहमदाबादकडे औषधी पेट्या घेऊन जात होते. त्यांनी विश्रांतीकरिता ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दरम्यान चोरट्यांनी ताडपत्री फाडून पेट्या चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. यात १४ हजार रुपयांचे नुकसान झाले.(स्थानिक प्रतिनिधी)