२१ पथकाकडून २१ गावांत झाली शिवारफेरी

By Admin | Updated: January 6, 2015 23:06 IST2015-01-06T23:06:17+5:302015-01-06T23:06:17+5:30

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्वी तालुक्यात मंगळवारी शिवारफेरीवे आयोजन करण्यात आले होते. यात २१ गावांत पाहणी करण्यात आली.

There were 21 pilgrims in 21 villages | २१ पथकाकडून २१ गावांत झाली शिवारफेरी

२१ पथकाकडून २१ गावांत झाली शिवारफेरी

आर्वी : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्वी तालुक्यात मंगळवारी शिवारफेरीवे आयोजन करण्यात आले होते. यात २१ गावांत पाहणी करण्यात आली.
आज झालेल्या या शिवार फेरीत महसूल विभागाच्या चमूने बाजारवाडा येथे शिवाराची पाहणी केली व पिंळखुटा येथे ग्रामसभा घेतली. तालुक्यात निवड करण्यात आलेल्या २१ गावांकरिता २१ पथक तयार केले होते. एका पथकात चार कर्मचाऱ्याचा समावेश होता. या पथकाच्या माध्यमातून गावात पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
सतत उद्भवणाऱ्या टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेता सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ या उपक्रमांतर्गत महसुल तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानासाठी कृषी विभागाच्यावतीने आर्वी तालुक्यातील २१ गावांची शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्याच्या निवड केलेल्या गावात या अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.बी. माळी व इतर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळ घेण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: There were 21 pilgrims in 21 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.