शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मजूर मिळाले नाही तरी नो टेन्शन; आता रोबो करणार निंदण, शेतकऱ्यांचा खर्च वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:01 IST

सिंदी (रेल्वे) च्या सुपुत्राचा आविष्कार

प्रशांत कलोडे

सिंदी (रेल्वे) (वर्धा) : शेतकऱ्यांना शेतात वाढलेल्या तणाची समस्या सातत्याने भेडसावत असते. हंगामात मजुरांची वानवा असल्याने मजुरांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. बरेचदा मजुरांच्या प्रतीक्षेत शेतातील पिकांमध्ये तण आणखीच वाढत जाते. आता निंदणाकरिता मजूर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या दोन प्राध्यापकांनी यावर चक्क ‘तणनाशक रोबोट’ हा पर्याय शोधून काढला आहे. अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक असलेल्या या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तण केवळ पिकांसाठीच नव्हे तर, ते मानवांसाठी उपयुक्त नाहीत. ते झाडाच्या वाढीवर परिणाम करतात आणि ते काढून टाकणे आवश्यक असते. याकरिता वेळेवर मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फरपट होते. शेतकऱ्यांच्या या समस्येचा अभ्यास करून नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील प्रा. विजय ठाकरे व डॉ. संदीप खेडकर यांनी ‘तणनाशक रोबोट’ची संकल्पना मांडली. मात्र, शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान देणे हे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्या आव्हानाला पेलून त्यांनी अत्यंत कमी खर्चिक आणि सोलरवर चालणाऱ्या रोबोटची निर्मिती केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी ‘मॅन्युअली ऑपरेटिंग टूल्स’चा स्वस्त आणि उत्तम स्वयंचलित पर्याय उपलब्ध करून देता येणे शक्य झाले. यातील संशोधक डॉ. संदीप खेडकर हे सिंदी (रेल्वे) येथील रहिवासी असून या उपकरणामुळे सिंदीवासींनीही कौतुक केले.

सेन्सर ओळखणार शेतातील अडथळे

या तंत्रज्ञानासाठी प्राध्यापकांनी पेटंटसाठी नोंदणीही केली आहे. उपयुक्त शेतकऱ्यांच्या खुरपणीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी, स्वस्त आणि स्वयंचलित मार्ग शोधणे हे ‘तणनाशक रोबोट’चे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये स्वायत्त पोर्टेबल वीड कटर, बॅटरी सेन्सर, कटर, रिचार्जेबल बॅटरी, डीसी मोटार इत्यादींचा वापर केला आहे. सेन्सर्सद्वारे शेतामधील अडथळे ओळखण्यास मदत होणार असून त्यानुसार रोबोट आपले काम व्यवस्थित करेल. इतर सेन्सर तण शोधून ते कटरच्या साहाय्याने काढून टाकतील. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय असमान भूभागावर जाण्यासाठी वाहनाची रचना करण्यात आली आहे.

रोबोटमध्ये बॅटरीचा वापर करण्यात आला असून ते सोलरवरही चालते. त्यामुळे हे उपकरण पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे, वेळेची बचत होते. दुसरीकडे तण काढण्यासाठी मजुरांवरील खर्चापेक्षा कमी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या मोठ्या समस्यांचे समाधान सुलभतेने करता येईल.

- डॉ. संदीप खेडकर, संशोधक

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी