शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

मजूर मिळाले नाही तरी नो टेन्शन; आता रोबो करणार निंदण, शेतकऱ्यांचा खर्च वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:01 IST

सिंदी (रेल्वे) च्या सुपुत्राचा आविष्कार

प्रशांत कलोडे

सिंदी (रेल्वे) (वर्धा) : शेतकऱ्यांना शेतात वाढलेल्या तणाची समस्या सातत्याने भेडसावत असते. हंगामात मजुरांची वानवा असल्याने मजुरांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. बरेचदा मजुरांच्या प्रतीक्षेत शेतातील पिकांमध्ये तण आणखीच वाढत जाते. आता निंदणाकरिता मजूर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या दोन प्राध्यापकांनी यावर चक्क ‘तणनाशक रोबोट’ हा पर्याय शोधून काढला आहे. अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक असलेल्या या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तण केवळ पिकांसाठीच नव्हे तर, ते मानवांसाठी उपयुक्त नाहीत. ते झाडाच्या वाढीवर परिणाम करतात आणि ते काढून टाकणे आवश्यक असते. याकरिता वेळेवर मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फरपट होते. शेतकऱ्यांच्या या समस्येचा अभ्यास करून नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील प्रा. विजय ठाकरे व डॉ. संदीप खेडकर यांनी ‘तणनाशक रोबोट’ची संकल्पना मांडली. मात्र, शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान देणे हे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्या आव्हानाला पेलून त्यांनी अत्यंत कमी खर्चिक आणि सोलरवर चालणाऱ्या रोबोटची निर्मिती केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी ‘मॅन्युअली ऑपरेटिंग टूल्स’चा स्वस्त आणि उत्तम स्वयंचलित पर्याय उपलब्ध करून देता येणे शक्य झाले. यातील संशोधक डॉ. संदीप खेडकर हे सिंदी (रेल्वे) येथील रहिवासी असून या उपकरणामुळे सिंदीवासींनीही कौतुक केले.

सेन्सर ओळखणार शेतातील अडथळे

या तंत्रज्ञानासाठी प्राध्यापकांनी पेटंटसाठी नोंदणीही केली आहे. उपयुक्त शेतकऱ्यांच्या खुरपणीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी, स्वस्त आणि स्वयंचलित मार्ग शोधणे हे ‘तणनाशक रोबोट’चे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये स्वायत्त पोर्टेबल वीड कटर, बॅटरी सेन्सर, कटर, रिचार्जेबल बॅटरी, डीसी मोटार इत्यादींचा वापर केला आहे. सेन्सर्सद्वारे शेतामधील अडथळे ओळखण्यास मदत होणार असून त्यानुसार रोबोट आपले काम व्यवस्थित करेल. इतर सेन्सर तण शोधून ते कटरच्या साहाय्याने काढून टाकतील. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय असमान भूभागावर जाण्यासाठी वाहनाची रचना करण्यात आली आहे.

रोबोटमध्ये बॅटरीचा वापर करण्यात आला असून ते सोलरवरही चालते. त्यामुळे हे उपकरण पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे, वेळेची बचत होते. दुसरीकडे तण काढण्यासाठी मजुरांवरील खर्चापेक्षा कमी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या मोठ्या समस्यांचे समाधान सुलभतेने करता येईल.

- डॉ. संदीप खेडकर, संशोधक

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी