शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मजूर मिळाले नाही तरी नो टेन्शन; आता रोबो करणार निंदण, शेतकऱ्यांचा खर्च वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:01 IST

सिंदी (रेल्वे) च्या सुपुत्राचा आविष्कार

प्रशांत कलोडे

सिंदी (रेल्वे) (वर्धा) : शेतकऱ्यांना शेतात वाढलेल्या तणाची समस्या सातत्याने भेडसावत असते. हंगामात मजुरांची वानवा असल्याने मजुरांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. बरेचदा मजुरांच्या प्रतीक्षेत शेतातील पिकांमध्ये तण आणखीच वाढत जाते. आता निंदणाकरिता मजूर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या दोन प्राध्यापकांनी यावर चक्क ‘तणनाशक रोबोट’ हा पर्याय शोधून काढला आहे. अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक असलेल्या या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तण केवळ पिकांसाठीच नव्हे तर, ते मानवांसाठी उपयुक्त नाहीत. ते झाडाच्या वाढीवर परिणाम करतात आणि ते काढून टाकणे आवश्यक असते. याकरिता वेळेवर मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फरपट होते. शेतकऱ्यांच्या या समस्येचा अभ्यास करून नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील प्रा. विजय ठाकरे व डॉ. संदीप खेडकर यांनी ‘तणनाशक रोबोट’ची संकल्पना मांडली. मात्र, शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान देणे हे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्या आव्हानाला पेलून त्यांनी अत्यंत कमी खर्चिक आणि सोलरवर चालणाऱ्या रोबोटची निर्मिती केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी ‘मॅन्युअली ऑपरेटिंग टूल्स’चा स्वस्त आणि उत्तम स्वयंचलित पर्याय उपलब्ध करून देता येणे शक्य झाले. यातील संशोधक डॉ. संदीप खेडकर हे सिंदी (रेल्वे) येथील रहिवासी असून या उपकरणामुळे सिंदीवासींनीही कौतुक केले.

सेन्सर ओळखणार शेतातील अडथळे

या तंत्रज्ञानासाठी प्राध्यापकांनी पेटंटसाठी नोंदणीही केली आहे. उपयुक्त शेतकऱ्यांच्या खुरपणीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी, स्वस्त आणि स्वयंचलित मार्ग शोधणे हे ‘तणनाशक रोबोट’चे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये स्वायत्त पोर्टेबल वीड कटर, बॅटरी सेन्सर, कटर, रिचार्जेबल बॅटरी, डीसी मोटार इत्यादींचा वापर केला आहे. सेन्सर्सद्वारे शेतामधील अडथळे ओळखण्यास मदत होणार असून त्यानुसार रोबोट आपले काम व्यवस्थित करेल. इतर सेन्सर तण शोधून ते कटरच्या साहाय्याने काढून टाकतील. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय असमान भूभागावर जाण्यासाठी वाहनाची रचना करण्यात आली आहे.

रोबोटमध्ये बॅटरीचा वापर करण्यात आला असून ते सोलरवरही चालते. त्यामुळे हे उपकरण पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे, वेळेची बचत होते. दुसरीकडे तण काढण्यासाठी मजुरांवरील खर्चापेक्षा कमी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या मोठ्या समस्यांचे समाधान सुलभतेने करता येईल.

- डॉ. संदीप खेडकर, संशोधक

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी