शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पोहण्याचा नाद बेतला जिवावर; नववीचे शिक्षण घेणाऱ्या दोघांचा बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : ‘मी खेळायला जातोय’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन युवकांनी थेट शेतातील विहीर गाठली. याच विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या शहापूर शिवारात उघडकीस आली असून देवांशू नीलेश घोडमारे (१४) रा. आसोलेनगर व युगंधर धर्मपाल मानकर (१५) रा. साईनगर अशी मृत युवकांची नावे असून, हे दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होते.खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतांची ओळख पटविली. तेव्हा ते दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमधील नववीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृतकांची ओळख पटल्यावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

बंद मोबाईल ठरला शोध घेण्यात अडथळा-    देवांशू हा शनिवारी दुपारी ५ वाजता क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री ८ वाजले पण तो घरी न परतल्याने व शोध घेऊन त्याची माहिती न मिळाल्याने देवांशूच्या कुटुंबीयांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती देत देवांशू जवळील मोबाईलच्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण मोबाईलच बंद येत असल्याने व अखेरचे लोकेशन मोहन रेस्टॉरन्ट येत असल्याने पोलीसही हतबल झाले होते. अशातच रविवारी सकाळी देवांशूचा मृतदेह विहिरीत सापडला.

अशी उघडकीस आली घटना-    रविवारी माटोडा-बेनोडा मार्गावरील मौजा शहापूर शिवारातील राजेश गुल्हाणे यांच्या शेतात काम करीत असलेले मजूर पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहले असता त्यांना एका युवकाचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून विहिरीच्या पाण्यात तरंगत असलेला एक तर गाळात अडकलेला दुसरा, असे एकूण दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. तसेच मृतांची ओळख पटविली. शिवाय पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. 

देवांशूची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर युगंधरचे आईवडील शिक्षक

-    देवांशू घोडमारे याची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर वडील शेतकरी आहेत. शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला देवांशू आपल्याला तर डॉक्टरच व्हायचे आहे, असे तो नेहमीच अनेकांना सांगायचा. पण या घटनेमुळे घोडमारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.-    युगंधर मानकर याचे आईवडील शिक्षक आहेत. युगंधरचे वडील इगतपुरी येथे विपशना प्रशिक्षण केंद्रात गेले होते. त्यांना ही दुःखद माहिती भ्रमणध्वनीवरून देण्यात आली.

कुटुंबीयांना न सांगताच जायचे शेतातील विहिरीवर पोहायला-    कुटुंबीयांना कुठलीही माहिती न देता ही दोन्ही मुलं मागील काही दिवसांपासून गुल्हाणे यांच्या शेतातील विहिरीत पोहायला जात होती. पण शनिवारी पोहण्यासाठी दोराच्या साह्याने विहिरीत उतरलेल्या या दोन्ही मुलांवर काळाने झडपच घेतली. या दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आर्वी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.

 

टॅग्स :SwimmingपोहणेDeathमृत्यू