शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आयुष्यात नुकसानाचे व्रण कायम! १०० गावांतील तेरा हजार शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:01 IST

Wardha : ऑक्टोबरच्या पावसात ८,६३४ हेक्टरवरील पीक बाधित

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाच्या जखमा कमी होत नाही तोच पुन्हा परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात नुकसान केले होते. यात तब्बल १२ हजार ९७० शेतकऱ्यांच्या ८,६३३.९९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला; मात्र अद्याप निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्रण कायम आहेत.

पावसाळ्याचा पहिला महिना कोरडा गेला. नंतर झालेल्या पावसाने दाणादाण उडविली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

त्याचे वितरण सुरू आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे देवळी, आर्वी तालुक्यांला फटका बसला. या दोन तालुक्यांतील १०० गावांतील १२, ९७० शेतकऱ्यांचे ८,६३३.९९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी रूपये झाले जमाअतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २७,१३१.८० हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यासाठी ३६ कोटी २१ लाख ७६ हजार ६७० रुपयांचा प्रस्ताव सरकार कडे पाठवला व शेतकाऱ्याच्या खतात ३० कोटी २० लाख ५२ हजारांचा निधी जमा झाला.

११.७६ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत १०० गावांतील ८ हजार ६३३.१९ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. नुकसानापोटी शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून ११ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले आहे.

"जुलै-सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून घ्यावी. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच त्याचे वितरण केले जाणार आहे." - शुभम घोरपडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा