शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्याचे ‘राज’कारण; पोलीस ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

विशेष म्हणजे मुस्लीम धर्मगुरूंनी पहाटे ५ वाजता भोंगे न वाजवता नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचे विधान केले. त्यानंतर या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. काल २ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी अल्टिमेटम दिला. मात्र, सर्व धार्मिक स्थळांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा पोलीस दलही अधिक सतर्क झाले असून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर करडी नजर ठेवून आहे. औरंगाबाद येथील सभेनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर निर्माण होणारा संघर्ष टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मुस्लीम धर्मगुरूंनी पहाटे ५ वाजता भोंगे न वाजवता नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचे विधान केले. त्यानंतर या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. काल २ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी अल्टिमेटम दिला. मात्र, सर्व धार्मिक स्थळांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बुधवार, ४ रोजीपासून मशिदींसमोर ध्वनिक्षेपक लावून हनुमान चालीसा वाचण्याचा अल्टिमेटम दिला आहे. या घोषणेनंतर पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस दलाकडून शांतता व सुव्यस्था कायम राखण्यासाठी सर्व ठिकाणीच धार्मिक ठिकाणावर लक्ष केंद्रीत केले आहे.

सोशल मीडियावर ‘वॉच’-    कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जाती, धर्माच्या भावना दुखवतील अशा पोस्ट, मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी पोलीस मित्रांची मदत घेतली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

१९ पोलीस ठाण्यांतील १८०० कर्मचारी तैनात -    सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळांबाहेर पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या निर्णयाचे कुणीही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. - यशवंत सोळंकी, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा

 

टॅग्स :Policeपोलिस