शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

राजकीय आखाडा तापला; सत्तेसाठी विरोधकांशी हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:33 IST

सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा रणसंग्राम : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप साधताहेत संधी

वर्धा : सत्तांतर झाल्यापासून राज्यात राजकीय शांतता पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. अशातच आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्याने ही लोकसभा आणि विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा रंगू लागला असून, ‘सत्तेसाठी काही पण!’ अशीच भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने कार्यकर्त्यांनीही तोंडात बोट टाकले आहे.

जिल्ह्यात वर्धा, सिंदी (रेल्वे), पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे) आणि हिंगणघाट या सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडून द्यायचे असल्याने एकूण १२६ संचालकांकरिता नामांकन अर्ज दाखल झाले असून, निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. आतापर्यंत अपवादवगळता सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ही महाविकास आघाडी सर्व निवडणुका सोबत लढणार असल्याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून होत असली तरीही स्थानिक पातळीवर मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुठे भाजप काँग्रेसच्या गटासोबत, तर कुठे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीकरिता मतांचा जोगवा मागत असल्याने या विचित्र युतीमुळे मतदारही संभ्रमात आहेत.

कोणत्या पक्षाचे बळ किती?

काँग्रेस : जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, अंतर्गत कुरघोड्यांमुळे या जिल्ह्यामध्ये केवळ एक आमदार आहे. परंतु, सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच अग्रस्थानी आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे.

राष्ट्रवादी : जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी युतीतून सत्ता राखण्याचे काम केले आहे. बाजार समितीवरही यांनी सत्ता कायम ठेवली आहे. बहुतांश बाजार समित्यांवर यांचाच सभापती व उपसभापती राहिला आहे. हल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समितीमध्ये मोठी पकड आहे.

भाजप : गेल्या दोन पंचवार्षिकपासून जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद चांगलीच वाढली आहे. चारपैकी तीन विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघही त्यांच्याच ताब्यात आहेत. यासोबतच मिनी मंत्रालयातही त्यांचीच सत्ता होती. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही उडी घेतली असून, सत्तेसाठी हातमिळवणी सुरू आहे.

उद्धव ठाकरे गट : शिवसेनेच्या फुटीनंतरही कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे जुनी शिवसेना अद्याप जिल्ह्यामध्ये अस्तित्व राखून आहे. एका नगरपंचायतीत उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा असून, त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे.

पुढचे सरकार आमचेच! 

जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी पूर्ण क्षमतेने रिंगणात उतरली आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसल्याने स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढविली जाते. तरीही सर्वांना महाविकास आघाडीनेच निवडणूक लढण्याच्या सूचना केल्या आहेत.

- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी लढवीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ही निवडणूक सहकार क्षेत्राशी संबंधित असल्याने या क्षेत्राशी निगडीत स्थानिक गटांसोबत युती केली आहे. कुठे युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे.

- सुनील गफाट, जिल्हाध्यक्ष, भाजप

जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या युतीनेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लढविल्या आहेत. आताही महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात निवडणुका लढविल्या जात असून, काही ठिकाणी समविचारी पक्षांना किंवा गटांना सोबत घेतले जात आहे.

- सुनील राऊत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनीही नामांकन दाखल केले आहे. तिन्ही पक्षांंच्या एकजुटीने ही निवडणूक लढविली जात असून, शिवसेना पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे.

- अनिल देवतारे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत लढत आहोत. केवळ एकाच बाजार समितीमध्ये एक उमेदवार उभा केला आहे. इतर ठिकाणी उमेदवार नाही. पण, आमचा भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा व सहकार्य आहे.

- गणेश इखार, जिल्हाप्रमुख, शिवसेना, एकनाथ शिंदे गट

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धा