शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:47 IST

सेलू पोलिसांची यशस्वी कारवाई : बिहार राज्यातील पिरापुरा मथुरातून घेतले ताब्यात

वर्धा : विवाहित महिलेला आमिष दाखवून पळवून नेत नेपाळ येथे विकण्याचा प्लॅन सेलू पोलिसांनी उधळून लावला असून महिलेला बिहार राज्यातील पिरापुरा जिल्ह्यातील मथुरा गावातून सुरक्षितरित्या ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्राप्त माहितीनुसार, येळाकेळी येथील रहिवासी २१ वर्षीय विवाहितेला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार तिच्या पतीने १५ ऑगस्ट रोजी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने महिलेच्या शोधार्थ तपास सुरू केला. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, तांत्रिक तपासाच्या मदतीने महिला बिहार राज्यात असल्याची माहिती मिळाली आणि तेथून तिला विकण्याचा प्लॅन असल्याचे पोलिसांना समजले.

महिलेने जाण्यापूर्वी तिच्या फेसबुक मॅसेंजरवर मेसेज पाठविला होता यावरून पोलिसांनी तपासाला दिशा दिली असता तांत्रिक तपासाच्या मदतीने तिचा ठावठिकाणा कुठे आहे ते समजले.

पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धनंजय पांडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुख्साना शेख यांचे पथक बिहार राज्यासाठी रवाना झाले. महिलेचे लोकेशन बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील पिरापुर मथुरा गावात दिसून आले. मात्र, ते गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने आणि संवेदशील असल्याने महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र, पोलिसांनी अथक परिश्रम घेत विविध संकटांना सामोरे जात बेपत्ता महिलेस ताब्यात घेत सुरक्षितरित्या सेलू पोलिस ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

सतत दोन महिने तपास अन् मिळाले यश..

ऑगस्ट महिन्यात येळाकेळी येथून बेपत्ता झालेल्या महिलेस शोधण्यासाठी सेलू पोलिसांची चमू विविध जिल्ह्यात रवाना झाली होती. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून महिलेचा सुगावा लागला. दोन महिन्यानंतर महिलेस बिहार राज्यातून ताब्यात घेतले अन् पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

‘त्या’ गावात इतर राज्यातील महिलांचाही उपस्थिती

प्राप्त माहितीनुसार, ज्या गावात बेपत्ता महिला मिळून आली त्या गावापासून नेपाळ बॉर्डर अतिशय जवळ असल्याने त्या गावातून अशा महिलांना विकण्याचे काम होणार होते. गावात विविध राज्यातील महिला व मुलींची देखील उपस्थिती होती. अशातच सेलू पोलिसांच्या पथकाने गाव गाठून क्षणाचाही विलंब न करता महिलेला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणwardha-acवर्धाBiharबिहार