शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

येळाकेळीतून बेपत्ता झालेल्या विवाहितेला विकण्याचा ‘प्लॅन’ पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:47 IST

सेलू पोलिसांची यशस्वी कारवाई : बिहार राज्यातील पिरापुरा मथुरातून घेतले ताब्यात

वर्धा : विवाहित महिलेला आमिष दाखवून पळवून नेत नेपाळ येथे विकण्याचा प्लॅन सेलू पोलिसांनी उधळून लावला असून महिलेला बिहार राज्यातील पिरापुरा जिल्ह्यातील मथुरा गावातून सुरक्षितरित्या ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्राप्त माहितीनुसार, येळाकेळी येथील रहिवासी २१ वर्षीय विवाहितेला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार तिच्या पतीने १५ ऑगस्ट रोजी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने महिलेच्या शोधार्थ तपास सुरू केला. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, तांत्रिक तपासाच्या मदतीने महिला बिहार राज्यात असल्याची माहिती मिळाली आणि तेथून तिला विकण्याचा प्लॅन असल्याचे पोलिसांना समजले.

महिलेने जाण्यापूर्वी तिच्या फेसबुक मॅसेंजरवर मेसेज पाठविला होता यावरून पोलिसांनी तपासाला दिशा दिली असता तांत्रिक तपासाच्या मदतीने तिचा ठावठिकाणा कुठे आहे ते समजले.

पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धनंजय पांडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुख्साना शेख यांचे पथक बिहार राज्यासाठी रवाना झाले. महिलेचे लोकेशन बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील पिरापुर मथुरा गावात दिसून आले. मात्र, ते गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने आणि संवेदशील असल्याने महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे होते. मात्र, पोलिसांनी अथक परिश्रम घेत विविध संकटांना सामोरे जात बेपत्ता महिलेस ताब्यात घेत सुरक्षितरित्या सेलू पोलिस ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

सतत दोन महिने तपास अन् मिळाले यश..

ऑगस्ट महिन्यात येळाकेळी येथून बेपत्ता झालेल्या महिलेस शोधण्यासाठी सेलू पोलिसांची चमू विविध जिल्ह्यात रवाना झाली होती. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून महिलेचा सुगावा लागला. दोन महिन्यानंतर महिलेस बिहार राज्यातून ताब्यात घेतले अन् पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

‘त्या’ गावात इतर राज्यातील महिलांचाही उपस्थिती

प्राप्त माहितीनुसार, ज्या गावात बेपत्ता महिला मिळून आली त्या गावापासून नेपाळ बॉर्डर अतिशय जवळ असल्याने त्या गावातून अशा महिलांना विकण्याचे काम होणार होते. गावात विविध राज्यातील महिला व मुलींची देखील उपस्थिती होती. अशातच सेलू पोलिसांच्या पथकाने गाव गाठून क्षणाचाही विलंब न करता महिलेला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणwardha-acवर्धाBiharबिहार