शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

जिल्ह्यातील राजकारणामध्ये महिलांचा टक्का अद्याप कमीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:28 IST

आतापर्यंत दोनच महिलांना संधी : यंदाच्या निवडणुकीत सहा महिला रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याच्या राजकारणात महिलांचा टक्का प्रारंभापासूनच कमीच असल्याचे चित्र असून विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्याचा एकंदरित विचार केल्यास केवळ दोनच महिलांना देवळी विधानसभा क्षेत्रातून विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांचा राज्याच्या राजकारणात तसा टक्का फारच कमी आहे.

आजपर्यंत देवळी विधानसभा मतदारसंघातून दोन महिलांनी विधिमंडळ गाठले होते. यामध्ये पहिल्यांदा स्व. प्रभा राव आणि दुसऱ्यांदा सरोज काशिकर यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील लोकसभाच नव्हे तर, विधानसभेत महिला पोहोचल्याच नाहीत. म्हणजेच दोनच महिलांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिलांना मिळालेली संधी पाहता महिलांचा जिल्ह्याच्या राजकारणातील टक्का तुलनेने कमीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का मोठा आहे. मात्र, तो तिथपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्याची व्याप्ती विधिमंडळ किंवा संसदेपर्यंत पोहोचलीच नसल्याचे जिल्ह्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. यंदाही फक्त सहाच महिला रिंगणात आहेत. 

जिल्ह्याच्या लोकसंख्येत मागील पाच वर्षात वाढ झाली आहे. पुरुषांबरोबरच महिलां मतदारांची संख्याही निर्णायक असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांनाही संधी दिल्यास त्या देखील जिल्ह्याचे नेतृत्व करु शकेल. 

गेल्या निवडणुकीत एकच महिला रिंगणात

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून फक्त एकाच महिलेने भाग्य आजमावले होते. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मंदा रमेश ठावरे या अपक्ष उमेदवार होत्या. 
  • विशेष म्हणजे, अन्य तीन विधानसभा मत- दारसंघातून महिला रिंगणात उतरल्याच नव्हत्या. महिलांना विधानसभेची तिकीट दिली जात नसल्याचेही आताच्या राजकार- णातून दिसून येत आहे. 

यंदा सहा महिला निवडणुकीसाठी इच्छुक यंदाच्या निवडणुकीमध्ये सात महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मयुरा काळे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वर्षा कन्नाके, मंगला ठक अपक्ष, देवळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून अश्विनी शिरपू- रकर, माधुरी डाहारे अपक्ष तर वर्धा विधानसभा मतदारसंघातून स्मिता नगराळे अपक्ष अशा सहा महिला उमेदवार रिंगणात आहे.

मतदानाचा टक्का होता जास्त २०१९ च्या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आला. त्यावेळी ५,५३,१३३ महिला मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारी बघितल्यास ६० महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे यंदाही महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्याचीही गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४