शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जिल्ह्यातील राजकारणामध्ये महिलांचा टक्का अद्याप कमीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:28 IST

आतापर्यंत दोनच महिलांना संधी : यंदाच्या निवडणुकीत सहा महिला रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याच्या राजकारणात महिलांचा टक्का प्रारंभापासूनच कमीच असल्याचे चित्र असून विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्याचा एकंदरित विचार केल्यास केवळ दोनच महिलांना देवळी विधानसभा क्षेत्रातून विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांचा राज्याच्या राजकारणात तसा टक्का फारच कमी आहे.

आजपर्यंत देवळी विधानसभा मतदारसंघातून दोन महिलांनी विधिमंडळ गाठले होते. यामध्ये पहिल्यांदा स्व. प्रभा राव आणि दुसऱ्यांदा सरोज काशिकर यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील लोकसभाच नव्हे तर, विधानसभेत महिला पोहोचल्याच नाहीत. म्हणजेच दोनच महिलांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिलांना मिळालेली संधी पाहता महिलांचा जिल्ह्याच्या राजकारणातील टक्का तुलनेने कमीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का मोठा आहे. मात्र, तो तिथपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्याची व्याप्ती विधिमंडळ किंवा संसदेपर्यंत पोहोचलीच नसल्याचे जिल्ह्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. यंदाही फक्त सहाच महिला रिंगणात आहेत. 

जिल्ह्याच्या लोकसंख्येत मागील पाच वर्षात वाढ झाली आहे. पुरुषांबरोबरच महिलां मतदारांची संख्याही निर्णायक असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांनाही संधी दिल्यास त्या देखील जिल्ह्याचे नेतृत्व करु शकेल. 

गेल्या निवडणुकीत एकच महिला रिंगणात

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून फक्त एकाच महिलेने भाग्य आजमावले होते. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मंदा रमेश ठावरे या अपक्ष उमेदवार होत्या. 
  • विशेष म्हणजे, अन्य तीन विधानसभा मत- दारसंघातून महिला रिंगणात उतरल्याच नव्हत्या. महिलांना विधानसभेची तिकीट दिली जात नसल्याचेही आताच्या राजकार- णातून दिसून येत आहे. 

यंदा सहा महिला निवडणुकीसाठी इच्छुक यंदाच्या निवडणुकीमध्ये सात महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मयुरा काळे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वर्षा कन्नाके, मंगला ठक अपक्ष, देवळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून अश्विनी शिरपू- रकर, माधुरी डाहारे अपक्ष तर वर्धा विधानसभा मतदारसंघातून स्मिता नगराळे अपक्ष अशा सहा महिला उमेदवार रिंगणात आहे.

मतदानाचा टक्का होता जास्त २०१९ च्या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आला. त्यावेळी ५,५३,१३३ महिला मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारी बघितल्यास ६० महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे यंदाही महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्याचीही गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४