शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पुनर्वसनाचा प्रश्न खितपत; दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे परिवारासह धरणे-आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:54 IST

तीन जिल्ह्यातील शेतकरी बाधित

पोहणा (वर्धा) :वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक दिवसांपासून खितपत पडून आहे. प्रकल्पग्रस्तांचे भूमी अधिग्रहण कायद्यानुसार भूसंपादन व सावंगी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी परिवारासह वर्धा नदीवरील दिंदोडा प्रकल्पस्थळी धरणे-आंदोलन सुरू केले आहे.

वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीवर सन २०१७ पासून दिंदोडा बॅरेज प्रकल्प साकार होत आहे. या तिन्ही जिल्ह्यातील अनेक गावे प्रकल्पबाधित झाली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सावंगी (जोड) गावासह इतरही गावे या प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. सावंगी गावापासून काही अंतरावरच या सिंचन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्यांनी अनेकदा आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. तरीही शासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने आता प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी मुलाबाळांसह आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्तांमध्ये खदखदतोय संताप

दिंदोडा प्रकल्पबाधित गावांचे २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार पुनर्वसन करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यापूर्वी बैलबंडी मोर्चा, नदीवर दिवे समर्पण, मानवी साखळी, अधिकाऱ्यांना घेराव, कामबंद आंदोलन अशा प्रकारची अनेक आंदोलने केलीत. परंतु शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला तर नाहीच आणि पुनर्वसनही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप खदखदत आहे.

टॅग्स :localलोकलagitationआंदोलनwardha-acवर्धा