शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुनर्वसनाचा प्रश्न खितपत; दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे परिवारासह धरणे-आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:54 IST

तीन जिल्ह्यातील शेतकरी बाधित

पोहणा (वर्धा) :वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक दिवसांपासून खितपत पडून आहे. प्रकल्पग्रस्तांचे भूमी अधिग्रहण कायद्यानुसार भूसंपादन व सावंगी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी परिवारासह वर्धा नदीवरील दिंदोडा प्रकल्पस्थळी धरणे-आंदोलन सुरू केले आहे.

वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीवर सन २०१७ पासून दिंदोडा बॅरेज प्रकल्प साकार होत आहे. या तिन्ही जिल्ह्यातील अनेक गावे प्रकल्पबाधित झाली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सावंगी (जोड) गावासह इतरही गावे या प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. सावंगी गावापासून काही अंतरावरच या सिंचन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्यांनी अनेकदा आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. तरीही शासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने आता प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी मुलाबाळांसह आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्तांमध्ये खदखदतोय संताप

दिंदोडा प्रकल्पबाधित गावांचे २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार पुनर्वसन करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यापूर्वी बैलबंडी मोर्चा, नदीवर दिवे समर्पण, मानवी साखळी, अधिकाऱ्यांना घेराव, कामबंद आंदोलन अशा प्रकारची अनेक आंदोलने केलीत. परंतु शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला तर नाहीच आणि पुनर्वसनही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप खदखदत आहे.

टॅग्स :localलोकलagitationआंदोलनwardha-acवर्धा