शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक आयोगाचा कारभार झाला दस नंबरी ! आणखी किती पुरावे द्यायचे"; हर्षवर्धन सपकाळ यांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:44 IST

Wardha : हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या नावासमोर 'स्टार' लावावेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : राहुल गांधी यांनी मतचोरी प्रकरणात निवडणूक आयोगाला ठोस पुरावे सादर केले आहेत. आणखी किती पुरावे द्यायचे? तरीही आयोग झोपेतून जागा होण्यास तयार नाही. निवडणूक आयोगाचा कारभार 'दस नंबरी' झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सेवाग्राम येथे केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या नावासमोर 'स्टार' लावावेत. आम्ही इतका मोठा दस्तऐवज आयोगासमोर ठेवला, तरी ते पुरावेच मागत आहेत. पुरावे दिल्यानंतरही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.

शेतकरी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. पॅकेज जाहीर केले; पण त्यात किती गळती आहे, हे बघितले नाही. शेतकऱ्यांकरिता प्रहारचे बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन केले. त्यांना शासनाने दिलेले आश्वासन फोल ठरू नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी इतकीच अपेक्षा आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या आघाडीबद्दल विचारले असता सपकाळ म्हणाले की, त्यांनी अद्याप काँग्रेसकडे कोणत्याही प्रकारचा आघाडीचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आघाडीचा प्रश्नच येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांनाच देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission's work is corrupt: Harshvardhan Sapkal's allegations.

Web Summary : Harshvardhan Sapkal accuses Election Commission of corruption, citing Rahul Gandhi's evidence of voter fraud. He criticizes the commission's inaction and demands transparency. He also mentioned farmer loan waiver.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानwardha-acवर्धा