शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मद्यपींचा हिरमोड अन् काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘बल्ले-बल्ले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 22:06 IST

वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा ध्यास पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घेतला आहे. शहरासह जिल्ह्यातील दारूविक्रेते ‘अंडरग्राउंड’ झाले असून दारू मिळणे कठीण झाल्याने मद्यप्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. असे असतानाच जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील काही कर्मचारी बाहेरगावाहून, तर काही कर्मचाऱ्यांना गावातच अगदी सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने त्यांची ‘बल्ले बल्ले’ सुरू आहे. अशा काही मद्यपी कर्मचाऱ्यांवरही लगाम लावणे गरजेचे आहे. वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. अवघ्या १६ ते १७ दिवसांतच त्यांच्या मार्गदर्शनात लाखोंचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करून गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. शहरातील दारूविक्रेत्यांनी शहरातून पलायन केले. यामुळे मद्यप्यांना दारू मिळणे कठीण झाले.जिल्ह्यात दारूची प्रभावी अंमलबजावणी सुरू असतानाच जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांना हॉटेलात, काहींना बाहेरगावाहून, तर काहींना गावातूनच दारू उपलब्ध होत असल्याने कर्तव्यावरदेखील ते मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याचे चित्र आहे. हे वास्तव जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत आहे. यावर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी लगाम लावणे गरजेचे आहे. 

‘साहेबां’नी ठाणेदारांना द्याव्यात सूचना...- जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्याची नितांत गरज आहे. शहरातील दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे, तसा काही मद्यपी कर्मचाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे; तरच पूर्णपणे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

ठरावीक हॉटेलात विशेष सेवा- शहरालगत किंवा शहराबाहेरील काही ठरावीक ढाबे, हॉटेलांत काही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. ‘स्पेशल’ टेबल लावून कर्मचारी दारूचे घोट रिचवीत असल्याचे दिसून येत आहे. ही बाबही गंभीर आहे. शहरातील काही हाॅटेल्स तसेच शहरालगतच्या ढाब्यांवरही अशा कर्मचाऱ्यांची रात्रीच्या सुमारास मद्यपार्टी सुरू असते. हे विशेष !

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस