शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:33 IST

Vardha : खासदार काळे यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकारचे मोठ्या प्रमाणात उदासीन धोरण आहे. आजही विदर्भात आत्महत्या होत आहेत. याला कारणीभूत कोण? २०१४ मध्ये यवतमाळ येथे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' करून शेतकऱ्यांना हमी भाव, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे विविध आश्वासने दिली होती. मात्र, एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने पुन्हा दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' कार्यक्रम घेत शेतकऱ्यांसाठी अकरा वर्षांत काय केले हे सांगावे? असा प्रश्न खासदार अमर काळे यांनी संसदेत उपस्थित केला.

कापसाला सात हजार रुपये भाव आहे, तर साडेचार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकले जात आहे. केंद्र सरकारने आश्वासन पाळले असते, तर शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असता. पिकाला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांचे अर्धे प्रश्न असेच सुटले असते. मात्र, प्रश्न सुटत नसल्याने विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतीवर आहे. याकडे मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि इतर पट्टयातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे सव्वा लाख मेट्रिक टन संत्रा जात होता. मात्र, या संत्र्यावर या पाच वर्षात १०१ टक्के ड्युटी लावल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. संत्र्याला भाव नाही, याकडे संसदेने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. यासोबतच संसद अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, मोर्शी, वरुड येथील संत्रा उत्पादक यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्य सेवेत पार्ट टाइम सेविकांच्या मानधनात वाढ, घरकुल योजनेत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, असे विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

'चाय पे चर्चा' करण्यासाठी आवाहनशेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्यां केंद्र सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. यवतमाळ दौऱ्यांचा उल्लेख करीत गत ११ वर्षात शेतकयांसाठी काय केले, यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा 'चाय पे चर्चा' करण्याचे थेट आवाहन खासदार काळे यांनी केले.

टॅग्स :Amar Kaleअमर काळेcongressकाँग्रेसwardha-acवर्धा