शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:48 IST

गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : नरभक्षक वाघ युवराज, पिंकी की अन्य; वनविभागही अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय ऐन शेतीच्या हंगामात मशागतीच्या वेळेवर नागरिकांची वाघाने घाबरगुंडी उडवून दिली.खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्राला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. कॅटरिनाचे मोठे झालेले नऊ बछडे यासह युवराज व पिंकी या बहीण भावाची जोडी गत दोन महिन्यांपासून येथे मुक्काम ठोकून आहे.सुसूंद शिवारातील शेती ही मदना धरणाला लागून असल्याने पिंकी व युवराज यांनी या भागात आपले बस्तान ठोकले आहे. मात्र ही बहीण-भावाची जोडी आक्रमक नसल्याने मनुष्यावर हल्ला करीत नाही. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे; पण शेवटी वाघ म्हटले की भीती आलीच. त्यामुळे खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना नागरिक निरूत्साहाने शेतात जातात. पण डोक्यावर भीतीची टांगती तलवार असते.आमगाव येथे चेतन दादाराव खोब्रागडे या युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाची अद्याप ओळख पटली नसली तरी कॅटरिनाच्या वयात आलेला बछडा असल्याचे बोलले जाते. सध्या तो वाघ माळेगाव (ठेका) व आमगाव शिवारात लोकांना रोज दर्शन देत आहे. शेतातील कड्याळुची सवंगणी करणे आता गरजेचे असताना नागरिकांत भीती निर्माण झाल्याने कामे रखडली आहे. वनविभागाने सदर भागात गस्त वाढवून नागरिकांना धीर दिला तरच शेती कसता येईल, अन्यथा यंदाचा हंगामात जमीन पडिक राहण्याखी भीती निर्माण झाली आहे.या हल्ल्यामुळे लोकांना ‘बाजीराव’ ची आठवण आली. तो बाजारगाव नजीक रस्ता अपघातात मरण पावला. त्याच्या सुरस कथा आजही त्या भागात ऐकायला मिळतात. कापूस वेचत असणाऱ्या महिलेच्या बाजूच्या ओळीतून जातानाही महिलेला कधी भय वाटले नाही. शेतात बांधलेल्या बैजजोडी जवळून जाताना त्याने कधी बैलजोडीकडे ढुकूंणही पाहिले नाही.या भागात कॅटरिनाचे नऊ बछडे असून आता पुन्हा तिने पिल्लांना जन्म दिल्याची माहिती आहे. पण ती सवयीप्रमाणे महिना-दीड महिना पिल्लाना बाहेर काढत नाही, असे वनविभाग सांगत आहे.वाघांचा बंदोबस्त करा यासाठी आमगाव, माळेगाव (ठेका), रामपूर, साईल, येणीदोडका, मरकसूर, गरमसूर, उमरविहिरी येथील लोकांनी सभेचे आज आयोजन केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ