शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:48 IST

गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : नरभक्षक वाघ युवराज, पिंकी की अन्य; वनविभागही अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय ऐन शेतीच्या हंगामात मशागतीच्या वेळेवर नागरिकांची वाघाने घाबरगुंडी उडवून दिली.खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्राला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. कॅटरिनाचे मोठे झालेले नऊ बछडे यासह युवराज व पिंकी या बहीण भावाची जोडी गत दोन महिन्यांपासून येथे मुक्काम ठोकून आहे.सुसूंद शिवारातील शेती ही मदना धरणाला लागून असल्याने पिंकी व युवराज यांनी या भागात आपले बस्तान ठोकले आहे. मात्र ही बहीण-भावाची जोडी आक्रमक नसल्याने मनुष्यावर हल्ला करीत नाही. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे; पण शेवटी वाघ म्हटले की भीती आलीच. त्यामुळे खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना नागरिक निरूत्साहाने शेतात जातात. पण डोक्यावर भीतीची टांगती तलवार असते.आमगाव येथे चेतन दादाराव खोब्रागडे या युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाची अद्याप ओळख पटली नसली तरी कॅटरिनाच्या वयात आलेला बछडा असल्याचे बोलले जाते. सध्या तो वाघ माळेगाव (ठेका) व आमगाव शिवारात लोकांना रोज दर्शन देत आहे. शेतातील कड्याळुची सवंगणी करणे आता गरजेचे असताना नागरिकांत भीती निर्माण झाल्याने कामे रखडली आहे. वनविभागाने सदर भागात गस्त वाढवून नागरिकांना धीर दिला तरच शेती कसता येईल, अन्यथा यंदाचा हंगामात जमीन पडिक राहण्याखी भीती निर्माण झाली आहे.या हल्ल्यामुळे लोकांना ‘बाजीराव’ ची आठवण आली. तो बाजारगाव नजीक रस्ता अपघातात मरण पावला. त्याच्या सुरस कथा आजही त्या भागात ऐकायला मिळतात. कापूस वेचत असणाऱ्या महिलेच्या बाजूच्या ओळीतून जातानाही महिलेला कधी भय वाटले नाही. शेतात बांधलेल्या बैजजोडी जवळून जाताना त्याने कधी बैलजोडीकडे ढुकूंणही पाहिले नाही.या भागात कॅटरिनाचे नऊ बछडे असून आता पुन्हा तिने पिल्लांना जन्म दिल्याची माहिती आहे. पण ती सवयीप्रमाणे महिना-दीड महिना पिल्लाना बाहेर काढत नाही, असे वनविभाग सांगत आहे.वाघांचा बंदोबस्त करा यासाठी आमगाव, माळेगाव (ठेका), रामपूर, साईल, येणीदोडका, मरकसूर, गरमसूर, उमरविहिरी येथील लोकांनी सभेचे आज आयोजन केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ