शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

निसर्गकोपाचे दहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM

मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी वरुणराजाने तब्बल दीड महिना उशिराने कृपादृष्टी करित जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नदी-नाल्यांना आलेला पूर आणि विजेच्या स्पर्शाने जिल्ह्यातील दहा जणांना आपला जीव गमवावा लागल तर पाच जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले. यामध्ये बाहेर राज्यातील एकाचा समावेश आहे. या सात जणांपैकी एकाचा अद्यापही मृतदेह सापडला नसल्याची नोंद आहे.यासोबतच शेतशिवारात काम करीत असताना पडलेल्या विजेमुळेही तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर पाच जण जखमी झाले होते. जखमींवर उपचार केल्याने सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे.या निसर्ग कोपामुळे चार महिन्यात दहा जणांचा बळी गेला असून शासनानेही याची नोंद घेत तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.८९ जनावरे दगावलीनैसर्गीक आपत्तीचा जनसामान्यांसह पुशधनालाही मोठा फटका बसला. या चार महिन्यात जिल्ह्यातील जवळपास ८९ जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये मोठी दुधाळ जनावरे ४०, लहान जनावरे २४, बैल २४ आणि १ गोºह्याचा समावेश आहे. ऐन हंगामात पूर आणि विज पडल्यामुळे जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दगावलेल्या जनावरांची किंमत जास्त असतानाही शासनाकडून मिळालेली मदत ही तोकड्या स्वरुपाची असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.मृतकाच्या परिवाराला मिळाली शासकीय मदतशासनाकडून मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी चार लाखाची मदत देण्यात आली. वीज पडून मृत पावलेल्या तिघांपैकी दोघांना मदत मिळाली असून एकाला मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर पुरात वाहून गेलेल्या सात जणांपैकी एक बाहेर राज्यातील आहे तर एकाचा मृतदेह अद्याप सापडला नाही. त्यामुळे उर्वरित मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी ४ लाख रुपयांप्रमाणे मदत देण्यात आली.यासोबतच जखमींना मदत मिळाली असून एक आठवड्यापर्यंत रुग्णालयात उपचार घेणाºयाला ४ हजार ३०० रुपये तर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उपचार घेणाऱ्याला १२ हजार ७०० रुपयाची मदत दिली आहे.नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या ४० मोठ्या दुधाळ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी ३० हजार रुपये तर लहान दुधाळ जनावरे, बैल अशा ४८ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी २५ हजार आणि गोºह्याच्या मोबदल्यात १६ हजार रुपयाची शासनाने मदत दिली आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग