शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

दहा प्रकल्प होणार गाळमुक्त; ठरणार साठवणुकीस उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प गाळमुक्त करणे या राष्ट्रीय कामात लोकसहभाग वाढावा म्हणून विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पुणे येथील खडकवासला धरणातील तब्बल २५ लाख ट्रक गाळ काढून आणखी मोठ्या प्रमाणात गाळ काढल्या जात असलेल्या ग्रीन थम्ब या संस्थेच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यातील तब्बल दहा प्रकल्पातून गाळ काढून या प्रकल्पांना गाळमुक्त करण्यात येणार आहे. आगामी काळात हे काम कसे पूर्णत्त्वास जाईल याबाबतचा ॲक्शन प्लॅन गुरुवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या कामाविषयी जिल्हा प्रशासनही सकारात्मक असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या दहा प्रकल्पांतून काढला जाणार गाळ-    देवळी तालुक्यातील कोल्हापूर, आर्वी तालुक्यातील कुऱ्हा, महाकाळी, उमरी, सारंगपुरी, हिंगणघाट तालुक्यातील पोथरा, आष्टी तालुक्यातील आष्टी, सेलू तालुक्यातील डोंगरगाव, कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प, सेलू तालुक्यातील बाेरधरण या तलावातून गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे विशेष.

विविध सामाजिक संघटनांचेही घेणार सहकार्य

-    वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प गाळमुक्त करणे या राष्ट्रीय कामात लोकसहभाग वाढावा म्हणून विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांनीही जाणली माहिती-    ग्रीन थम्ब या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील कुठल्या प्रकल्पातून गाळ काढला जाईल, शिवाय त्याबाबतचा ॲक्शन प्लॅन कसा राहील, याबाबतची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी ग्रीन थम्ब या संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील आणि सुनील रहाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मागेल त्या शेतकऱ्यास मिळेल गाळ-    विविध प्रकल्पांमधील गाळ हा शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे मागेल त्या शेतकऱ्याला गाळ दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील दहा प्रकल्पातून गाळ काढला जाणार आहे. त्यासंदर्भातील ॲक्शन प्लॅन वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना सादर केला आहे. मागेल त्या शेतकऱ्याला गाळ उपलब्ध करून दिला जाणार असून लोकसहभागातूनच हे काम होणार आहे.- कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थम्ब संस्था.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण