शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

तेलंगण, आंध्रातील दीडशे कामगार अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही.

ठळक मुद्देचार धर्मशाळांमध्ये व्यवस्था : विविध सामाजिक सघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचे आदेश दिले असताना वर्ध्यातील एका कॉस्मॅटीक कंपनीत प्रशिक्षणाकरीता आलेले तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सुमारे दीडशेच्यावर कामगार वर्ध्यातच अडकले आहे. त्यासर्वांच्या निवासाची व्यवस्था बच्छराज धर्मशाळेत करण्यात आली असून विविध सामाजिक संघटनांच्यावतीने पुढाकार घेत त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा देण्यात येत आहे.वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही. त्यामुळे मिळेल त्याठीकाणी रात्री काढण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना शहरातील विविध सामाजिक संघटना, एंजीओ यांनी त्यासर्वांना बच्छराज धर्मशाळेत एकत्र आणून त्यांच्या निवासाची आणि दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना, सपर्मण संस्था, बचतगट, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, निवसीड चाईल्डलाईन, ऑल इंडिया एक्स बिएसएफ वेल्फेअर संघ, प्रहार वाहन चालक संघटना, युथ फॉर चेंज, जिल्हा अन्नदान समिती आदी विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्यावतीने त्यांना मदत पुरविण्यात येत आहे.चारही धर्मशाळेत वैद्यकीय पथकाची नियुक्तीसंचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचे स्थलांतर होऊ नये, म्हणून अशांची व्यवस्था शहरातील चार धर्मशाळेत करण्यात आली आहे. त्यानुसार बच्छराज धर्मशाळेत राजेश खामनकर, आशिष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदन मोहन धर्मशाळेत मंडळअधिकारी आर.बी. झामरे, प्रदीप मुंघाटे, संत कवरराम धर्मशाळेत तलाठी राजू देशमुख, अविनाश मरघडे तर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे तलाठी प्रदीप लोन, आणि प्रविण बोबडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यासर्वांकडे क्वारंटाइन असलेल्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्ता, आदींची व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासर्वांवर नियुक्त पथकाची निगराणी राहणार आहे.कामगारांची वैद्यकीय तपासणीशास्त्री चौकात असलेल्या बच्छराज धर्मशाळेत आश्रय घेत असलेल्या दीडशे कामगारांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यासर्वांना जेथे आहे तेथेच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मजूर घेऊन जाणारे दोन वाहन अडविलेहिंगणघाट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने जिह्यासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे कामगार, मजुरांनी घराकडे धाव घेतली आहे. चेन्नईवरून ग्वाल्हेरच्या दिशेने आणि हैदराबादकडून नागपूरकडे मजूर घेऊन जाणाºया वाहनांना हिंगणघाट पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग सात वरील उपजिल्हा रूग्णालय चौकात अडविले. वाहनातील सर्व मजुरांना मोहता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले असून सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या