शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

वादळामुळे घरावरील टिनपत्रे उडाली

By admin | Updated: June 4, 2014 00:16 IST

पिपरी (मेघे) नजीकच्या गणेशपूर येथे रविवारी आलेल्या वादाळाने गावात थैमान घातले. वादळात गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले. यात एक गाय व दोन बैलही

वर्धा :  पिपरी (मेघे) नजीकच्या गणेशपूर येथे रविवारी आलेल्या वादाळाने गावात थैमान घातले. वादळात गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले. यात एक गाय व दोन बैलही जखमी झाले असून  दोन लाखावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र या नुकसानीची पाहणी करण्याकरिता अद्याप एकही शासकीय कर्मचारी गावाकडे फिरकला नसून ग्रामस्थांना मदतीची अपेक्षा आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कडाक्याचं उन्ह होत. पण दुपारी १२ वाजताच्या नंतर अचानक वातावरणात बदल घडून आला. यानंतर  सोसाट्याचा वारा वाहत वादळाला सुरुवात झाली. या वादळामध्ये गावातील तीन ते चार घरांवरील टिनपत्र उडाली. सूदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र टिनपत्रे उडल्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले. एकाएकी आलेल्या वादळामुळे नागरिकात भीती होती. या घटनेत जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. टिनपत्रे उडाल्याने अनेकांच्या घराच्या भींतीही पडल्या. त्यामुळे घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. त्याचवेळी दमदार पावसाने हजेरी लावली. अनेकांच्या घरातील धान्यही ओले झाले. वाळवणाकरिता टाकलेल्या धान्याची यामुळे नासाडी झाली. टिनपत्रे उडाल्याने घरातील फर्निचर ओले झाले. तसेच कपडे व घरातील धान्य आदीचे नुकसान झाले. यामुळे ग्रामस्थांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून या नुकसानीचा आढावा घेण्यात आला नाही. यामुळे येथील ग्रामस्थांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल का या विवंचनेत नागरिक आहे.