शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

तृष्णातृप्तीसाठी टँकर ठरताहेत मदतगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:00 IST

जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी अन् खरांगणा वनपरिक्षेत्रात पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. वनविभागाकडून केली गेलेली ही सोय वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी मदतगारच ठरत आहे.यंदा वनविभागाने जिल्ह्यातील विविध भागात तब्बल १५० कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांच्या अधिवासात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. असे असले तरी रोही, हरिण, माकड, नीलगाय आदी झाडांची पाने खाऊन जगणारे वन्यप्राणी जंगलात मुबलक प्रमाणात चारा नसल्याने शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर काही हिंसक पाण्याच्या शोधार्थ शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातच वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह मुबलक प्रमाणात चारा कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशी वन्यजीप्रेमींची मागणीही आहे. सध्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठाही केला जात आहे. ज्या पद्धतीने मनुष्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्याच पद्धतीने सध्या वनविभागाच्यावतीने वन्यप्राण्यांच्या अधिवासात टँकरद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. असे असले तरी आर्वी आणि खरांगणा या भागातील जंगलातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटल्याने आणि काही कृत्रिम पाणवठ्यांच्या बोअरवेलने तळ गाठल्याने खासगी टँकर लावून कृत्रिम पाणवठे पाण्यानी भरली जात आहे. त्यामुळे मनुष्यासह वन्यप्राण्यासाठी टँकरने होणारा पाणी पुरवठा मदतगार ठरत आहे.मार्च अखेरीस दिला मोबदलाखरांगणा वन परिक्षेत्रात एकूण १६ कृत्रिम पाणवठे असून येथे पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या सहकार्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नि:शुल्क पाणी टाकले जात आहे. इतकेच नव्हे, तर याच वनपरिक्षेत्रातील बोअरवेल असलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांपैकी तीन बोअरवेल असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातील बोअरवेलने तळ गाठल्याने एका खासगी टँकरच्या सहाय्याने पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात आहे. मार्च अखेरीस सुमारे १० हजारांचे देयक टँकर मालकाला देण्यात आले आहे. तर आर्वी वनपरिक्षेत्रात सात नैसर्गिक पाणवठे आणि पाच कृत्रिम पाणवठे आहेत. त्यापैकी बोअरवेल असलेले तीन पाणवठे आहेत. मात्र, तेथेही पाणीटंचाई असल्याने एक खासगी टँकर लावण्यात आला आहे. याच टँकरच्या सहाय्याने सध्या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. येथेही मार्च अखेरीस टँकर मालकाला देयक अदा करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीforestजंगल