तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे धरणे
By Admin | Updated: April 21, 2016 02:26 IST2016-04-21T02:26:02+5:302016-04-21T02:26:02+5:30
तलाठी साजांची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार यातील अडचणींसह अन्य मागण्या प्रलंबित आहेत.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे धरणे
मागण्या प्रलंबित : महसूल कर्मचाऱ्यांचाही आंदोलनात सहभाग
वर्धा : तलाठी साजांची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार यातील अडचणींसह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
तलाठी साजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करण्याची मागणी ३० एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली होती. त्यांच्या बैठकीला वर्षभराचा कालावधी लोटला; पण मागणी पूर्ण झाली नाही. सातबारा संगणकीकरणावर चर्चा झाली. यानंतरही सातबारा संगणीककरण व ई-फेरफारमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या नाहीत. याबाबत अनेकदा लेखी तक्रारी केल्या. सॉफ्टवेअरमधील चुका लक्षात आणून दिल्या; पण कारवाई झाली नाही. याबाबत जमाबंदी आयुक्तांचे परिपत्रक व उच्च न्यायालय मुंबईच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले आहे.