शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:00 PM

स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएक टँकरची खरेदी : दहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिच पाणी समस्या निकाली काढण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्याच एकूण नऊ विहिरी अधिग्रहित केल्या आहे. शिवाय एक नवीन टँकरचीही खरेदी केली आहे. सुमारे दहा टँकरद्वारे नागरिकांना पुरक पाणी पुरवठा करण्याचा मानस वर्धा न.प.चा असल्याचे सांगण्यात आले.वर्धा शहरातील रामनगर, तुकाराम वॉर्ड, जुनी म्हाडा कॉलनी, गांधीनगर, लक्ष्मीनगर, तारफैल, पुलफैल, स्टेशन फैल, दयालनगर, हिंदनगर, कृष्णनगर, जुना आरटीओ चौक परिसर आदी भागातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. परंतु, महाकाळी येथील ज्या धाम जलाशयातून सोडलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथून उचल करून नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो, तोच जलाशय यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाहिजे तसा भरला नाही. शिवाय हिवाळ्याच्या दिवसातच भविष्यातील पाणी समस्या लक्षात घेता धाममधील उपलब्ध पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. परिणामी, सध्या वर्धेकरांना न.प. प्रशासन नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहेत. भविष्यात ही पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने नागरिकांना टँकरनेही पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याच विहिरींमधील पाण्याची उचल करून त्या पाण्याचा पुरवठा दहा टँकरच्या सहाय्याने नागरिकांना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. वर्धा शहरातील रामनगर जैन मंदिर परिसरातील विहिरींनी आतापर्यंतच्या दुष्काळी परिस्थितीत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी याच भागातील विहिरींनी तळ गाठल्याने वर्धा शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; पण त्यापैकी केवळ चार उपयोगी पडणार आहेत.पालिकेकडे तीन टँकरवर्धा नगरपरिषद प्रशासनाकडे पूर्वी दोन टँकर होते; पण नवीन एक टँकरची खरेदी करण्यात आल्याने ही सध्या आता तीन इतकी झाली आहे. असे असलेले तरी जलसंकटावर मात करण्यासाठी दहा टँकरने वर्धेकरांना पाणी पुरवठा करण्याचा मानस उराशी बाळगणारा न.प. प्रशासन आणखी सात टँकर भाडेतत्त्वावर घेणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई