शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्या, अन्यथा डिसेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन; पेन्शनधारकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:48 IST

पेन्शनर्स सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

वर्धा : ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी रखडलेले आहेत. यासंदर्भात अनेक आंदोलन केले, शासनाला निवेदनही दिले. परंतु, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. पण, केंद्र शासनाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा डिसेंबर महिन्यात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

दिल्ली येथील सत्यसाई सभागृहात भारत पेन्शनर्स सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सेवानिवृत्त कर्मचारी-१९९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत पेन्शनर्स सोसायटीचे सचिव प्रकाश येंडे यांनी उपस्थितांना हा इशारा दिला. सप्टेंबर-२०१४ मध्ये किमान निवृत्तीवेतन १ हजार रुपये करण्यात आले. तेव्हापासून एका रुपयाचीही वाढ केलेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकांत असंतोष खदखदत आहे.

महामागाईच्या या युगात सरकारने ७५ लाख पेन्शनधारकांना सन्मानजनक पेन्शन देऊन भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली तर या ईपीएस पेन्शनच्या २९ कोटी सदस्यांचाही सरकारडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे केंद्र शासनाने ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेत ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सन्मानजनक वाढ करावी. अन्यथा, १२ डिसेंबरपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू करून येत्या निवडणुकीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही देण्यात आला. या सभेत भारत पेन्शनर सोसायटी, नवी दिल्लीचे सरचिटणीस एस.सी.माहेश्वरी, ईपीएस-९५ पेन्शनर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, भारत पेन्शनर सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि देशभरातील पेन्शनधारक उपस्थित होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनagitationआंदोलनwardha-acवर्धा