शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

अप्रमाणित, निकृष्ट बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बंधने घातलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  ग्रामीण भागातील कडक निर्बंध शिथिल करीत बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोस्ट ऑफिस, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे पोहोचविण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. असे असले तरी निकृष्ट व अप्रमाणित बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतमाल नेण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील कृषीशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निविष्ठा किंवा शेतीशी निगडित अवजारे पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती करून द्यावी. कृषी केंद्र चालकांना विविध कंपन्यांमार्फत खते, बियाण्यांचा पुरवठा करण्याकरिता निविष्ठा गोदामामध्ये उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला इंधन पुरवठा संबंधित पेट्रोल पंपधारकांनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बँका राहणार दोन वाजेपर्यंत सुरू

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना अडचण आल्यास याची जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते १ पर्यंत सूरू राहतील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप दिवसभर सुरू राहतील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बँका सुरू राहणार आहेत. पीक कर्जाचे प्रस्ताव शेतकऱ्यांना करता येणार आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती